tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post9018712454706553024..comments2024-03-06T01:50:18.593-08:00Comments on जागता पहारा: ‘आपण सारे पानसरे’ होऊ शकतो?bhau torsekarhttp://www.blogger.com/profile/04807630000365084577noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-43153501498860897662015-02-27T02:56:41.558-08:002015-02-27T02:56:41.558-08:00Loksatta
दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ...Loksatta <br /><br />दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. या कायद्यास सर्व धर्मातील कट्टरपंथीयांचा विरोध होता. त्यातही िहदू अधिक. त्यामुळे त्यांच्या हत्येमागे या उजव्या विचारांच्या शक्ती असाव्यात असे गृहीत धरून पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या बोलघेवडय़ांनी दाभोलकरांच्या हत्येनंतर जवळपास मारेकरी कोण हे सांगण्याचे तेवढे बाकी ठेवले होते. यातील काहींना- यात काही बांधीलकीवाले संपादकही होते- तर इतका चेव आला होता की त्यांच्या अभिव्यक्तीतील िहसा ही प्रत्यक्ष हल्लेखोरांच्या कृत्याशी जवळीक सांगणारी होती. हा हल्ला झाला त्या वेळी महाराष्ट्रात आणि केंद्रात काँग्रेस सत्तेवर होती. नरेंद्र मोदी यांच्या धडका केंद्र सत्तेवर बसायला सुरुवात होण्यास अवधी होता. तेव्हा काहींना वाटत होते त्याप्रमाणे दाभोलकर यांच्या हत्येमागे खरोखरच प्रतिगामी शक्ती असत्या तर त्यांना उजेडात आणण्यात राज्यातील आणि केंद्रातीलही सत्ताधीशांना आनंद वाटला असता. परंतु ते झाले नाही. कारण या मंडळींना वाटत होते तसे काही आढळले नसावे. वास्तविक अशा वेळी या बुद्धिजीवींनी आपण प्रतिक्रिया देण्यात जरा घाईच केली, अशी कबुली दिली असती तर त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि वैचारिक निष्ठांचा सच्चेपणा दिसून आला असता. आताही नेमकी तीच गल्लत अनेकांकडून होताना दिसते. िहसा ही वाईट आणि िनदनीयच. मग ती डाव्या विचारींविरोधात झालेली असो वा उजव्या. आज कॉम्रेड पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी प्रसृत होताच जणू आपल्याला त्यांच्यावरील हल्ल्यामागे कोण आहेत हे ठाऊकच आहे, अशा थाटात प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला आहे. देशात प्रतिगामी शक्तींची वाढ होत असून त्याचमुळे पानसरे यांच्यावर असा हल्ला झाला असे मेधा पाटकर म्हणाल्या. सध्या प्रतिगामी शक्तींचा सुळसुळाट झाला आहे, हे मान्यच. परंतु तसा तो व्हायच्या आधीही आपल्याकडे िहसाचार होताच, हे कसे विसरणार? दाभोलकर यांच्या कन्येच्या मते पानसरे यांच्यावरील हल्ला पूर्वनियोजित होता. आता हे उघडच आहे. हल्लेखोर पानसरे यांच्याशी चर्चाविनिमय करावयास गेले आणि निघताना त्यांना सहज म्हणून गोळ्या घातल्या, असे तर झाले नसणार. अशा प्रकारचे हल्ले हे पूर्वनियोजितच असतात. <br />तेव्हा महाराष्ट्राने ही निवडक नतिकता आता सोडायला हवी. याचे कारण सत्तेवर पुरोगामी म्हणवून घेणारे असोत वा प्रतिगामी. सत्तेमुळे येणाऱ्या राजकीय ताकदीचा आधार घेत आपली साम्राज्ये वाढवणाऱ्या शक्ती समानच असतात. त्यामुळे सरकार बदलले तरी ते चालवणाऱ्यांच्या आसपास घोंघावणारे दलाल बदलले जातात असे होत नाही. सत्तेमागील आर्थिक हितसंबंध तेच असतात. दाभोलकर, शेट्टी यांची हत्या, कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्यामागेदेखील हे आर्थिक हितसंबंध असू शकतात. पण त्याकडे आपले लक्षच जात नाही आणि पुरोगामित्व-प्रतिगामित्वाच्या कालबाहय़ आणि निष्फळ चर्चात आपण रमतो. अशा परिस्थितीत विचारांवर विश्वास असणाऱ्या सर्वानीच एकत्र यावयास हवे. कारण दाभोलकर, शेट्टी यांचे मारेकरी, कॉम्रेड पानसरे यांचे हल्लेखोर या महाराष्ट्राला इशारा देत आहेत : खबरदार.. विचार कराल तर..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3292746975402342498.post-72359990017053585772015-02-20T01:08:48.206-08:002015-02-20T01:08:48.206-08:00पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो.
बकासुराची गोष्ट ...पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो.<br /><br />बकासुराची गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. त्याचे भोजन म्हणून त्याला दररोज एक माणूस लागे. ते त्या गावातील लोकच मिळून दुस-या दिवशी कोणाचा नंबर हे ठरवत असत. असे सर्व सर्वसंमतीने चाललेले असताना तो भीम उगाचच मध्ये पडला आणि बकासुराच्या त्रासापासून त्या गावाला वाचवले. यातून दोन निष्कर्ष: १) त्या गावातील लोकांनी संघटीत प्रतिकार केल्याचे ऐकिवात नाही, तेव्हा त्या गावातील लोक मानसिकदृष्ट्या षंढ होते आणि २) असे अत्याचार थांबवायला बाहेरूनच कोणी तरी यावे लागते.<br /><br />आपल्याकडे फरक एवढाच की हा बकासुर त्याचे बळी स्वत: निवडत आहे. त्यात त्याला राजकीय पक्ष आणि पोलिस यांचे मनापासून सहकार्य मिळत आहे. आपल्याकडील बकासुराने अलीकडे लक्ष्य केलेले काही जण पुढीलप्रमाणे.<br /><br />क्र. १: सतीश शेट्टी<br />क्र. २: दाभोळकर<br />क्र. ३: पानसरे उभयता: दोघांचीही प्रकृती लवकरात लवकर सावरो ही इच्छा.<br />क्र. ४: कोण?<br />क्र. ५: कोण?<br /><br />सतीश शेट्टी आणि दाभोलकरांना त्यांच्या खुन्यांच्या मागे असलेल्यांनी पचवलेले आहेच. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे हिंदुत्ववादींकडे बोट दाखवणे, पण त्यातून काहीही निष्पन्न न होणे, भलत्याच गुन्हेगारांवर या खुनाची जबाबदारी टाकल्यावर ते प्रकरण अंगलट येणे, असे सर्व प्रकार होऊनही यामागचे गुन्हेगार मोकाटच आहेत. आज पानसरेंवरील हल्ल्याचा निषेध करणा-यांमध्येही ते असतील याचीही मला खात्री आहे. याचा अर्थ सरकार, राजकीय पक्ष आणि पोलिस यांनी मिळून तयार केलेले ‘Perfect Murder’चे नवीन तंत्र अंमलात आणण्यात येत आहे, असे स्पष्ट दिसते.<br /><br />आता तातडीने एक करा. जातीयतेच्या विषारी विळख्यात सापडलेल्या, राज्य भिकेला लागेपर्यंतचा भ्रष्टाचार निमुटपणे सहन करणा-या, राजकीय पक्ष व संघटीत गुन्हेगारी यांचे उघडउघड दिसणारे संबंध खपवून घेणा-या आणि वरचेवर भली माणसे मारली जात असेलेले उघड्या डोळ्यांनी पाहणा-या महाराष्ट्राला आता ‘पुरोगामी’ म्हणणे तातडीने बंद करा. ‘सर्वधर्मसमभाव’ यासारखाच हा शब्दही केवळ अशा प्रसंगीच वापरायचा इथपर्यंत बेगडी बनलेला आहे आणि तेवढाच भेसूर विनोदी झाला आहे. शिवाय महाराष्ट्राचा बिहार – उत्तरप्रदेश होऊ देऊ नये म्हणणा-यांनी ते तसे केव्हाच झालेले आहे हे वास्तव ध्यानात घ्यावे.<br /><br />आता यापुढे प्रत्येक वेळी अशी घटना घडल्यावर काडीचाही उपयोग न होणारा निषेध करण्यापेक्षा आपल्याकडे कोप-या-कोप-यावर दिसणारी बेकायदेशीर व गुन्हेगारी कृत्ये, या गोष्टींना मिळणारा राजकीय आश्रय, वर्षानुवर्षे या आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन देणारे पोलीस दल यांना जनतेनेच वठणीवर आणणे आवश्यक आहे हे पटते काय? मला वाटते, याबद्दल कोणाचेच दुमत होणार नाही. पण मग हे अंमलात कसे आणायचे यावर विचार कोण करेल?<br /><br />कारण कोणी भीम येऊन आपल्याला वाचवेल अशी अपेक्षा असेल, तर मग बोलणेच खुंटले. मग वर लिहिलेली प्रश्नचिन्हे काढून यादीमध्ये पुढची नावे लिहावीत.राजेश कुलकर्णीnoreply@blogger.com