Thursday, March 14, 2013

सेक्युलर पतिव्रतेची बांधिलकी



आपला गुलछबू नवरा आपल्यावर किती प्रेम करतो, याचे कौतूक त्याची पत्नी तिच्या मैत्रिणींना सातत्याने सांगायची. मजा अशी, की त्या मैत्रिणी तिच्या पतीप्रेमाला विरोध करीत नसत किंवा त्याबद्दल तिच्यासमोर कधी शंका घेत नसत. पण तिची पाठ वळली वा तिचे लक्ष नसेल; तेव्हा एकमेकींशी फ़िदीफ़िदी हसून त्या तिच्या पतीप्रेमाची टवाळी मात्र हमखास करीत असत. किंबहूना ती पतिव्रता त्यांच्यात नसली; मग तिच्या नवर्‍याची लफ़डी, हाच त्या मैत्रिणींचा कुजबुजण्य़ाचा मुख्य विषय असायचा. काही प्रमाणात हे तिच्याही कानी आलेले होते. पण मैत्रिणींना तिने कधी त्याबद्दल छेडले नव्हते. मग एके दिवशी या पतिव्रतेनेच मंडळातल्या दुसर्‍या मैत्रिणीच्या नवर्‍याला कुणासोबत बघितले आणि त्याची वाच्यता केली; त्यावरून खडाजंगी उडाली. तेव्हा मग हिच्या निष्ठावान नवर्‍याचा विषय खुलेआम आखाड्यात आला. तेव्हा आपल्या नवर्‍याचे प्रताप ऐकून तिचे डोके भणभणले. पण तिचा आपल्या पतीदेवावर अढळ विश्वास व निष्ठा होती. तिने चक्क मैत्रिणींचा नाद सोडला. ती त्यांच्या मंडळात जायची बंद झाली. याला म्हणतात पातिव्रत्य. त्यालाच म्हणतात बांधिलकी. सगळे जग एका बाजूला आणि आपण त्या बांधिलकीसाठी दुसर्‍या बाजूला.



एकेदिवशी तिचा नवरा ऑफ़िसमधून लौकर घरी आला आणि तब्येत थोडी बरी नाही म्हणून आलो, असे त्याने सांगितले. ही पतिव्रता खरेदी शॉपिंगला निघालेली. पतीने तिला निश्चिंत मनाने जायला सांगितले व अधिक तिच्याकडे आपले क्रेडीट कार्ड दिले. मस्त शॉपिंग करून यायला सांगितले. त्याला थकवा असल्याने भरपूर विश्रांतीची गरज होती. नवर्‍याच्या आग्रही व प्रोत्साहक वागण्याने पतिव्रता सुखावली. दाखवायपुरते थांबू का, डोके दाबून देऊ का, असे प्रश्न विचारले तिने. पण पतीनेच निघायचा आग्रह केला, तशी पडत्या फ़ळाची आज्ञा घेऊन, ती लगबगीने घराबाहेर पडली. पण बिचारीचे नशीब चांगले नव्हते. हातात क्रेडीट कार्ड असूनही, कुठे काही खरेदी करण्याजोगे तिला पसंतच पडत नव्हते. तासाभरात दोनतीन मॉल फ़िरून झाले. पण काहीच खरेदी जमली नाही. तेव्हा वैतागून नशीबाला दोष ती घरी परतली. मनात म्हणाली, कधी नाही ती पतिसेवा करू तेवढीच. बिचारा दिवसदिवस राबतो आपल्या चैनीसाठी. आज दुसरे काही काम नाही, तर पतिसेवेचे पुण्य पदरात पाडून घेऊ. मात्र याची तिच्या नवर्‍याला कल्पना नव्हती. शॉपिंग व क्रेडीट कार्ड असल्यावर लाडकी पत्नी तीनचार तास तरी माघारी येणार नाही, अशी त्याला खात्री होती. पण अनपेक्षितरित्या पतिव्रता तासाभरातच घरी परतली; तर दोघांनाही थक्क व्हायची पाळी आली. दोघांचा आपापल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, अशी स्थिती होती.

शयनगृहात त्या पतिव्रतेचे निष्ठावान पतिदेव भलत्याच कुणा अप्सरेसोबत प्रणयक्रिडेत रममाण झालेले होते. पतिव्रतेची सगळी झिंग क्षणात उतरली. आजवर मैत्रिणी सांगत होत्या; त्याचा साक्षात पुरावा तिच्या घरात व तिच्या समोर हजर होता. त्यामुळे रागाने बेभान झालेल्या पतिव्रतेला बोलताही येत नव्हते. तिच्या तोंडातून शब्दही फ़ुटत नव्हता. पण तो पतिदेव कसला बेरक्या. काही क्षणातच सावरला आणि आपल्या लाडक्या पत्नीला म्हणाला, लाडके काय झाले? तू अशी विचलित का झाली आहेस? तुला थक्क व अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. मी तुझ्याशीच एकनिष्ठ आहे. तुला जे काही दिसते आहे व दिसले आहे; त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आपण बांधिलकी व नितीमुल्ये जपणारी माणसे आहोत ना? मग जे दिसते त्याच्यावर विश्वास कसा ठेवून चालेल? तुझ्या पतीच्या शब्दावर विश्वास ठेव, तुझ्या पातिव्रत्यावर विश्वास ठेव. तुला फ़सवणार्‍या तुझ्या डोळ्य़ावर विश्वास ठेवून आजवर जपलेल्या निष्ठेची व बांधिलकीची नासाडी करणार आहेस का? निष्ठा, बांधिलकी आपल्याला कधी फ़सवत नाहीत. आपले डोळे फ़सवत असतात लाडके.

ती पतिव्रता तशीच उठली आणि तडक महिला मंडळात आली. तिला अनेक दिवसांनी परतल्याचे पाहून सगळ्या मैत्रिणी एकदम गप्प झाल्या. तर त्या शांततेचा भंग करीत आपली ही पतिव्रता म्हणाली. मला माझा पती निष्ठावान असल्याची खात्री पटली. उगाच तुमच्यावर चिडून क्लब सोडला होता. आपल्या सगळ्यांचेच नवरे किती निष्ठावान व बांधिकलीचे आहेत, त्याची आताच घरी खात्री पटली. अनुभवाचे बोल सांगते मैत्रिणींनो. त्या दिवशी रागावून निघून गेले त्याबद्दल माफ़ करा. सगळ्यांनी तिचे उभे राहून पुन्हा क्लबमध्ये स्वागत केले. आता तीही असल्या कुजबुजीमध्ये आडपददा न ठेवता सहभागी झाली. काही वेळाने कुजबुज संपली आणि उद्या वटसावित्रीच्या सणाला काय काय करायचे, त्याच्या नियोजनात मैत्रिणी रंगून गेल्या. 
----------------------------------------- 
असो. ही अर्थात एक भाकडकथाच आहे. पण त्यातला जो बोध आहे तो अस्सल सेक्युलर आहे. ज्या व्रतवैकल्याची सेक्युलर मंडळी हेटाळणी व टवाळी करण्यात धन्यता मानतात, त्याचे अनुकरण मात्र किती अगत्याने करतात, त्याची ही कहाणी आहे. आठवते दोन महिन्यांपुर्वी लोकसभा व राज्यसभेत एफ़डीआयचा मुद्दा गाजत होता. तेव्हा मुलायम व मायावती यांनी तावातावाने त्या परदेशी गुंतवणूकीच्या प्रस्तावाविरोधात भाषणे केली होती आणि त्या निर्णयामुळे देशाची व जनतेची किती घोर फ़सवणूक होणार यावर पांडित्य सांगितले होते. पण जेव्हा विषय मताला टाकायची वेळ आली; तेव्हा मुलायमचा समाजवादी पक्ष कथेतल्या पतिव्रतेप्रमाणे सभात्याग करून बाहेर पडला होता आणि भाषण विरोधी करूनही मायावतींनी सेक्युलर सरकारला अभय देण्यासाठी राज्यसभेत प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले होते. मग त्या भाकडकथेतला गुलछबू नवरा कोण आणि सेक्युलर पतिव्रता किती व त्यांचे वटसावित्रीचे व्रत कुठले; ते आणखी स्पष्ट करून सांगायला हवे का?


Tuesday, February 12, 2013

‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’


काल अफ़जल गुरू याला तिहार तुरुंगात फ़ाशी दिल्यावर वाहिन्यांवर चर्चा चालू होत्या. त्यात जे अनेकजणांची काश्मीरी मुस्लिम कसे भारताशी निष्ठावान आहेत ते सांगायची सेक्युलर स्पर्धा सुरू होती आणि अफ़जल सारखे लोक अपवाद आहेत असे दाताच्या कण्य़ा करून सांगायची केविलवाणी धडपड सुरू होती. हल्ली असा बेशरमपणा ऐकायची लोकांना सवय झाली आहे, म्हणूनच त्याचे फ़ारसे काही वाटले नाही. पण त्यातच सहभागी झालेला जुना मित्र, सहकारी हुसेन दलवाई याची ती धडपड किळसवाणी वाटली. कारण त्याला आपण धडधडीत खोटे बोलतोय याचीही लाज नव्हती. बाकी असल्या गोष्टी इतरांना सांगण्यापुर्वी हुसेन किंवा तत्सम जुन्या समाजवादी सेक्युलर युक्रांदियांनी (आपण अब्रूदार आहोत असे त्यांना अजून वाटत असेल तर) दिवंगत हमीद दलवाई याचा अनुभव जरा डोळसपणे वाचावा म्हणून हमीदच्या पुस्तकातला हा उतारा. जेव्हा काश्मीरात पाकिस्तानविषयी नुसती आपुलकी दाखवली तरी गजाआड जायची वेळ यायची व हुरीयत वगैरे भानगडी नव्हत्या, तेव्हा एक सामान्य काश्मीरी मुस्लिम युवकाचे हे वक्तव्य ही लढाई कशी धर्माची आहे, त्याची साक्ष देतोय, आणि ही साक्ष कुणा संघवाल्या हिंदुत्ववाद्याने नव्हे हमीद दलवाईंनी मांडली आहे. कदाचित आता लाजलज्जा सोडलेले सेक्युलर हमीदलाही भगवा आतंकवादी म्हणतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
===========================

‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’

भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये.मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’
मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.
‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले.
मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.
‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.
हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’
‘लढाई चाललेली पाहिली.’
‘कुणाची जीत होत आहे?’
‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’
कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.
मग तो बोलू लागला - अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.
मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’
तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’
श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’
===========================
१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे. आज जो सेक्युलर दांभिकपणा मी सातत्याने सांगत असतो वा दाखवत असतो, त्या आजाराची लक्षणे हमीदभाईंनी तेव्हाच ओळखली, लिहिली होती व काहीवेळी बोलताना सांगितली सुद्धा होती. या पुस्तकात अशा आजाराचे अनेक तपशील सापडू शकतील. पण हमीदचे पुरस्कर्ते व अनुयायी म्हणवणार्‍यांनी ती किती वाचलीत वा समजून घेतलीत देवजाणे. कारण तेव्हा तो हॉटेलमधला नोकर अजाण मुलगा जे बोलत होता, तेच आज खुलेआम राजकीय वक्तव्य म्हणून मांडले जात असते. तेव्हाही त्याचा हिंदूत्ववाद वा संघाशी संबंध नव्हता आणि आजसुद्धा नाही. पण सेक्युलर अंधश्रद्धेचे अंगारेधुपारे करणार्‍यातच मग्न असलेल्यांना सत्य कोणी सांगायचे व समजवायचे?
काल अफ़जल गुरू याला तिहार तुरुंगात फ़ाशी दिल्यावर वाहिन्यांवर चर्चा चालू होत्या. त्यात जे अनेकजणांची काश्मीरी मुस्लिम कसे भारताशी निष्ठावान आहेत ते सांगायची सेक्युलर स्पर्धा सुरू होती आणि अफ़जल सारखे लोक अपवाद आहेत असे दाताच्या कण्य़ा करून सांगायची केविलवाणी धडपड सुरू होती. हल्ली असा बेशरमपणा ऐकायची लोकांना सवय झाली आहे, म्हणूनच त्याचे फ़ारसे काही वाटले नाही. पण त्यातच सहभागी झालेला जुना मित्र, सहकारी हुसेन दलवाई याची ती धडपड किळसवाणी वाटली. कारण त्याला आपण धडधडीत खोटे बोलतोय याचीही लाज नव्हती. बाकी असल्या गोष्टी इतरांना सांगण्यापुर्वी हुसेन किंवा तत्सम जुन्या समाजवादी सेक्युलर युक्रांदियांनी (आपण अब्रूदार आहोत असे त्यांना अजून वाटत असेल तर) दिवंगत हमीद दलवाई याचा अनुभव जरा डोळसपणे वाचावा म्हणून हमीदच्या पुस्तकातला हा उतारा. जेव्हा काश्मीरात पाकिस्तानविषयी नुसती आपुलकी दाखवली तरी गजाआड जायची वेळ यायची व हुरीयत वगैरे भानगडी नव्हत्या, तेव्हा एक सामान्य काश्मीरी मुस्लिम युवकाचे हे वक्तव्य ही लढाई कशी धर्माची आहे, त्याची साक्ष देतोय, आणि ही साक्ष कुणा संघवाल्या हिंदुत्ववाद्याने नव्हे हमीद दलवाईंनी मांडली आहे. कदाचित आता लाजलज्जा सोडलेले सेक्युलर हमीदलाही भगवा आतंकवादी म्हणतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
===========================

‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’

भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये.मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’
मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.
‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले.
मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.
‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.
हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’
‘लढाई चाललेली पाहिली.’
‘कुणाची जीत होत आहे?’
‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’
कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.
मग तो बोलू लागला - अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.
मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’
तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’
श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’
=========================== 
१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे. आज जो सेक्युलर दांभिकपणा मी सातत्याने सांगत असतो वा दाखवत असतो, त्या आजाराची लक्षणे हमीदभाईंनी तेव्हाच ओळखली, लिहिली होती व काहीवेळी बोलताना सांगितली सुद्धा होती. या पुस्तकात अशा आजाराचे अनेक तपशील सापडू शकतील. पण हमीदचे पुरस्कर्ते व अनुयायी म्हणवणार्‍यांनी ती किती वाचलीत वा समजून घेतलीत देवजाणे. कारण तेव्हा तो हॉटेलमधला नोकर अजाण मुलगा जे बोलत होता, तेच आज खुलेआम राजकीय वक्तव्य म्हणून मांडले जात असते. तेव्हाही त्याचा हिंदूत्ववाद वा संघाशी संबंध नव्हता आणि आजसुद्धा नाही. पण सेक्युलर अंधश्रद्धेचे अंगारेधुपारे करणार्‍यातच मग्न असलेल्यांना सत्य कोणी सांगायचे व समजवायचे?

Saturday, February 9, 2013

‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’




काल अफ़जल गुरू याला तिहार तुरुंगात फ़ाशी दिल्यावर वाहिन्यांवर चर्चा चालू होत्या. त्यात जे अनेकजणांची काश्मीरी मुस्लिम कसे भारताशी निष्ठावान आहेत ते सांगायची सेक्युलर स्पर्धा सुरू होती आणि अफ़जल सारखे लोक अपवाद आहेत असे दाताच्या कण्य़ा करून सांगायची केविलवाणी धडपड सुरू होती. हल्ली असा बेशरमपणा ऐकायची लोकांना सवय झाली आहे, म्हणूनच त्याचे फ़ारसे काही वाटले नाही. पण त्यातच सहभागी झालेला जुना मित्र, सहकारी हुसेन दलवाई याची ती धडपड किळसवाणी वाटली. कारण त्याला आपण धडधडीत खोटे बोलतोय याचीही लाज नव्हती. बाकी असल्या गोष्टी इतरांना सांगण्यापुर्वी हुसेन किंवा तत्सम जुन्या समाजवादी सेक्युलर युक्रांदियांनी (आपण अब्रूदार आहोत असे त्यांना अजून वाटत असेल तर) दिवंगत हमीद दलवाई याचा अनुभव जरा डोळसपणे वाचावा म्हणून हमीदच्या पुस्तकातला हा उतारा. जेव्हा काश्मीरात पाकिस्तानविषयी नुसती आपुलकी दाखवली तरी गजाआड जायची वेळ यायची व हुरीयत वगैरे भानगडी नव्हत्या, तेव्हा एक सामान्य काश्मीरी मुस्लिम युवकाचे हे वक्तव्य ही लढाई कशी धर्माची आहे, त्याची साक्ष देतोय, आणि ही साक्ष कुणा संघवाल्या हिंदुत्ववाद्याने नव्हे हमीद दलवाईंनी मांडली आहे. कदाचित आता लाजलज्जा सोडलेले सेक्युलर हमीदलाही भगवा आतंकवादी म्हणतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
===========================

‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’

    भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये.मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’
मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.
‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले.
मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.
‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.
हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’
‘लढाई चाललेली पाहिली.’
‘कुणाची जीत होत आहे?’
‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’
कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.
मग तो बोलू लागला - अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी  चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.
मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’
तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’
श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’
=========================== 
१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे. आज जो सेक्युलर दांभिकपणा मी सातत्याने सांगत असतो वा दाखवत असतो, त्या आजाराची लक्षणे हमीदभाईंनी तेव्हाच ओळखली, लिहिली होती व काहीवेळी बोलताना सांगितली सुद्धा होती. या पुस्तकात अशा आजाराचे अनेक तपशील सापडू शकतील. पण हमीदचे पुरस्कर्ते व अनुयायी म्हणवणार्‍यांनी ती किती वाचलीत वा समजून घेतलीत देवजाणे. कारण तेव्हा तो हॉटेलमधला नोकर अजाण मुलगा जे बोलत होता, तेच आज खुलेआम राजकीय वक्तव्य म्हणून मांडले जात असते. तेव्हाही त्याचा हिंदूत्ववाद वा संघाशी संबंध नव्हता आणि आजसुद्धा नाही. पण सेक्युलर अंधश्रद्धेचे अंगारेधुपारे करणार्‍यातच मग्न असलेल्यांना सत्य कोणी सांगायचे व समजवायचे?


Sunday, December 30, 2012

डोंबिवलीची विद्या पाटिल आठवत सुद्धा नाही ना?

डोंबिवलीची विद्या पाटिल आठवत सुद्धा नाही ना?

खुप जुनी? होय म्हटले तर खुप जुनीच गोष्ट आहे. कारण हल्ली संपादक पत्रकारांसह राजकारणी व अभ्यासकांनाही आठवड्यापुर्वीच्या गोष्टी आठवत नाहीत मग सतरा वर्षापुर्वीच्या घटनेला जुनीच म्हणायला नको का? जेव्हा ही दिल्लीची निर्भया किंवा दामिनी बहुधा सहा वर्षाची फ़्रॉक घालणारी बाहुलीशी खेळणारी बालिका असेल तेव्हाची गोष्ट आहे. आज जी मुले मुली रस्त्यावर उतरलीत, त्यांचे नुकतेच जन्म झाले असतील किंवा पाळण्य़ात हसत रडत असतील तेव्हाची. १९९५ सालातली. मी ‘आपला वार्ताहर’ दैनिकाचा संपादक होतो आणि तेव्हा अशाच नरकवासातून डोंबिवलीची विद्या नावाची मुलगी गेली होती आणि तेव्हाही मी असाच आक्रोश केला होता. ती अनेक जाणत्यांनाही भावनाविवश प्रतिक्रिया वाटली होती. आज सतरा वर्षानंतर तोच आक्रोश सर्व महानगरात, रस्त्यावर, देशभर आणि समाजाच्या सर्व थरात होताना दिसल्यावर माझा दावा खरा असल्याचा आनंद मानावा की किती उशीर केलात, म्हणून सर्वांना शिव्याशाप द्यावेत, तेच कळेनासे झाले आहे. ‘लोकसत्ता’ दैनिकात (३१/१२/२०१२) आज ‘पोरी, तुझं चुकलंच..!’ या शिर्षकाचा अग्रलेख छापून आलाय. म्हणून त्या जुन्या आठवणी चाळवल्या. डोंबीवलीच्या विद्या पाटिलची रडवी मुद्रा माझ्यासमोर उभी राहिली आणि तो खुप खुप जुना अंक शोधून काढला. त्या जुन्या अग्रलेखाचे कात्रण इथे छायाचित्र रुपाने देतो आहे. वाचायला थोडे त्रासदायकच आहे. पण आपल्याला तेवढेही कष्ट करायचे नसतील तर..................







Sunday, December 23, 2012

(‘तू वेडा कुंभार’चे विडंबन)



धमक्या धाकावरती चाले 
सत्तेचे सरकार
जनता लोकशाही बेजार

गुन्ह्यागुन्ह्याचे रुप आगळे
शिक्षेचेही नियम वेगळे
पोलिस वकीलांनाही नकळे
न्याय मागता मिळते लाठी, गुंडाला अधिकार
जनता लोकशाही बेजार

तपास खटले चौकशी अटका
जुना कायदा तुटका फ़ुटका
जामीन मिळता होई सुटका
अन्यायाच्या अत्याचारा, नसे अंत ना पार
जनता लोकशाही बेजार

म्हणे कायदा धट्टाकट्टा
त्याच्या नावावरती बट्टा
कुत्रा ज्याच्या गळ्य़ात पट्टा
शेपूट त्याची त्याला ओढी, तो नुसता भुंकणार
जनता लोकशाही बेजार

Wednesday, December 19, 2012

उपाय आणि उपचारातला फ़रक


   नुकत्याच बांगला देश युद्धाच्या संदर्भातील आठवणींना उजाळा देणारा एक लेख वाचनात आला. त्यात पाकिस्तानी सैनिकांनी बांगला देशात त्यावेळी अत्याचार केले; त्यात काही लाख महिलांवर बलात्कार केल्याचा उल्लेख आहे. त्यांचा हेतू आणि दिल्लीतल्या या श्वापदांचा हेतू वेगळा असतो काय? तुम्ही तुमच्या महिलांना संरक्षण द्यायला नामर्द आहात; असे सत्ताधारी व राज्यकर्त्या प्रशासनाला त्यातून प्रत्येक बलात्कारी सांगत असतो. तो संदेश सरकारपर्यंत पोहोचला असे मला तरी, मंगळवारच्या चर्चेतून दिसले नाही. कारण एकूणच चर्चा व वक्तव्ये औपचारिक होती. आणखी एक गुन्हा झालेला आहे, आणखी एक बलात्कार घडला आहे, असेच चर्चा व वादविवादाचे स्वरूप होते. म्हणूनच मूळ बलात्कारी घटनेपेक्षा ती औपचारिकता अधिक भयकारी वाटते. त्या चर्चा वादविवादाचा सूर रोजची एक घटना किंवा बातमी असाच होता. त्यामध्ये कुठे त्या मुलीची वा अन्य बलात्कार पिडीत महिलेची व्याकुळता दिसली नाही. अशा गुन्ह्यातून उपजणारी वेदना व यातनांचा लवलेश त्या चर्चेत नव्हता किंवा बातम्यांमध्ये नव्हता. बलात्कार म्हणजे नेमके काय, त्याचे अज्ञानच त्याला कारणीभूत आहे असे वाटते. लैंगिक शोषण वा गैरफ़ायदा घेणे, असे बलात्काराचे स्वरूप नाही. तर त्या मुली-महिलेची इच्छा व इज्जत क्रुरपणे पायदळी तुडवणे असते. आणि म्हणूनच ती घटना एक नको असलेली यातनामय आठवण होऊन तिच्या मनाला चिकटून बसत असते. कितीही झटकली वा पुसली; म्हणून जिच्यापासून मुक्त होता येत नाही, अशी ती उद्विग्नता असते. कोणा न्यायाधीशाने एका प्रकारणात त्याचे नेमक्या शब्दात वर्णन केल्याचे स्मरते. शरीरावर बलात्कार एकदाच होतो. पण त्याचा तपास खटले व उल्लेख जितक्या वेळा होतो, तितक्या प्रसंगी त्या बलात्कारितेला त्याच असह्य यातनांतून जावे लागत असते. या गुन्ह्याची इतकी भयंकर व्याप्ती त्यावरच्या चर्चा, बातम्यातून कोणी लक्षात तरी घेतो का? नसेल तर अशा चर्चा हव्या कशाला व त्यातून साधले काय जाणार? घराबाहेर पडणार्‍या महिलेच्या मनातल्या भितीची सुतराम कल्पना चर्चेत दिसली का?

   इतक्या वेगाने असे गुन्हे होत आहेत आणि वाढतच आहेत, तर त्यावरचे उपाय का बदलले जात नाहीत? ज्या कायद्याने वा शिक्षेने धाक निर्माण होतो, त्याच मार्गाने अशा घटनांना पायबंद घालता येईल. पण दुर्दैव असे आहे, की नेहमी त्याच त्याच चर्चा चालतात, पण उपाय बदलण्याचा विचारही होत नाही. कालबाह्य झालेले कायदे आणि त्यांचाही अंमल नसणे; हे अशा सामाजिक दुखण्याचे खरे कारण आहे. आता इतका गदारोळ झाल्यावर त्यातल्या आरोपींची झपाट्याने धरपकड झालेली आहे. तेवढेच नाही तर विनाविलंब त्यांना पकडल्याबद्दल गृहखात्याने स्वत:ची पाठही थोपटून घेतली आहे. मग थोरामोठ्यांनी आपल्या अभ्यासपुर्ण प्रतिक्रिया देताना फ़ाशीच्या शिक्षेपासून कठोर शिक्षेच्या मागण्याही केलेल्या आहेत. पण असे प्रकार होऊच नयेत; यासाठी कोणाला उपाय सुचवावा असे वाटत नाही, याला पराभूत मनोवृत्ती म्हणतात. कठोर शिक्षा व तातडीने धरपकड केल्याचे जर समाधान असेल, तर त्यातून गुन्ह्याला एकप्रकारे मान्यता दिली जात असते, त्याचे काय? आम्ही शिक्षा देऊ, तुम्ही गुन्हा करा, गुन्हा होईपर्यंत शांत बसू; असाच सिग्नल त्या गुन्हेगारांना दिला जात नाही काय? गुन्हा रोखण्यासाठी कायदा व कायद्याचे राज्य असते, ह्याचे आपल्याला विस्मरण झाले आहे काय? आरोपीला कुठलीही शिक्षा देऊन झालेले गुन्ह्यामुळे नुकसान भरून येत नाही. म्हणूनच शिक्षा व खटले हे उपचार असतात, उपाय नसतात. उपाय म्हणजे आजारमुक्त गुन्हेगारीमुक्त निरोगी जीवन होय. म्हणूनच गुन्हेगारीमुक्त समाज निर्मितीच्या दिशेने कायद्याने वाटचाल करायला हवी. तेवढा कायद्याचा धाक असायला हवा. तशी कोणाची इच्छा दिसत नाही की प्रयत्नही दिसत नाही. मग मंगळवारी झाला तो नुसता तमाशाच नाही काय?

मित्रांनो शिक्षा कधीच महत्वाची नसते. त्यापेक्षा भयंकर असते ती शिक्षेची भिती. मी शाळेत असताना बहुतेक मास्तरांकडून बेदम मार खाल्लेला आहे. शेवटी तेच मारून दमले, पण मला कोणी धाक घालू शकला नव्हता. आणि त्यापैकी अनेकांनी तसे प्रामाणिकपणे बोलूनही दाखवले. एकच शिक्षक असे होते, की त्यांनी कधी अंगाला हात लावला नाही, की दमसुद्धा दिला नाही. मी त्यांना भयंकर घाबरत असे. आज इतक्या वर्षांनी विचार केल्यावर लक्षात येते, की कधीच शिक्षा न देणार्‍या त्या शिक्षकाने संयम संपून दिलीच शिक्षा; तर ती किती भयंकर असेल यालाच मी घाबरत असावा. शिक्षेचे स्वरूप वा माहिती असण्यापेक्षा तिच्याविषयीची अनाकलनिय अनिश्चितता अधिक भयभीत करणारी व म्हणून परिणामकारक असू शकते, असे माझे मत आहे. मग तो अपराधी माझ्यासारखा व्रात्य खोडकर विद्यार्थी असो, की नामचिन गुन्हेगार असो.
facebook

Monday, December 10, 2012

जय हो?

 जय हो?

पासष्ट वर्षापुर्वी 
आमच्यातल्याच काही गुलामांनी 
आम्हाला विकत घेतले 
आणि राजीखुशीने, अक्कलहुशारीने,
नशापाणी न करता
आमच्या अस्तित्वाचे गहाणपत्र
आम्ही त्यांना लिहून दिले
दर पाच वर्षांनी