Tuesday, January 1, 2019

केतकर आणि आरव्हीएस मणि

व्यापक कटाचा भाग (१)

r v s mani के लिए इमेज परिणाम

काही गोष्टी योगायोग वाटतात. पण व्यवहारात ते योगायोग नसतात, तर पुर्वतयारी व नियोजनातून घडवून आणलेले घटनाक्रम असतात. मात्र सामान्य लोकांना त्या गोष्टी घटनाक्रमात ओघानेचा घडून आ्ल्या, असे वाटण्याची सगळी सज्जता केलेली असते. उदाहरणार्थ २६/११ च्या मुंबई हल्ल्यात कसाब टोळीतल्या बहुतांश पाकिस्तानी फ़िदायीन हल्लेखोरांनी आपल्या मनगटावर भगव्या धाग्याचे बंधन बांधलेले असल्याची माहिती सर्वश्रुत आहे. जे धर्माने मुस्लिम आहेत आणि ज्यांना हिंदू दैवत वा धर्माविषयी कमालीचा तिरस्कार वाटतो, त्यांनी अशी ‘वेशभूषा’ कशाला केलेली होती? तर त्याचे उत्तर अमेरिकेत पकडल्या गेलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याने दिलेले आहे. मुंबईच्याच कुठल्या मंदिराबाहेर त्याने हे धागे खरेदी करून जिहादी तोयबांना पुरवले होते आणि ते बांधूनच त्यांनी मुंबईत निरपराध नागरिकांची कत्तल करावी अशी योजना होती. हातातल्या धाग्यांनी मोठे काय व्हायचे होते? तर त्या धाग्यामुळे त्यांना हिंदू ठरवले जाणे सोपे होते आणि त्याला वेळही लागला नाही. त्या घटनेनंतर काही महिन्यातच माजी पोलिस अधिकाती एस. एन मुश्रीफ़ यांचे ‘हु किल्ड करकरे’ नावाचे इंग्रजी पुस्तक आले. तो हल्ला हिंदू दहशतवादी व भारतीय गुप्तहेर संस्थेचा संयुक्त कट असल्याचे त्यातून अगत्याने सांगण्यात आले. पोलिस व अन्य यंत्रणांना ज्याचे धागेदोरे शोधायला काही वर्षे खर्ची पडली, पण त्याआधीच काही महिन्यात हे पुस्तक लिहून तयार झाले आणि त्याचा गाजावाजाही सुरू झाला. त्याच्या काही महिने आधीच करकरे यांची महाराष्ट्र पोलिसांच्या एटीएस पथकाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती आणि त्यांनी तोपर्यंत झालेले मालेगाव स्फ़ोटाचे तपासकाम गुंडाळून त्यात हिंदू दहशतवाद असल्याचा नवा सिद्धांत मांडलेला होता. किंबहूना त्यासाठीच त्यांना त्या पदावर आणलेले होते. याला व्यापक कटाचा एक भाग म्हणतात.

व्यापक कट म्हणजे अनेक लहानमोठ्या घटना घडवून आणण्याची शिजवलेली व्यापक योजना. मग त्याला पुरक ठरतील अशा लहानमोठ्या अनेक घटनांचे विणलेले जाळे म्हणजे व्यापक कट असतो. त्यातल्या अनेक घटना एकमेकांपासून खुप दुर संबंधही जोडता येणार नाही, अशा एकाचवेळी घडत असतात. त्याच्या बातम्याही झळकत असतात. तर काही घटनांचा कुठे उल्लेखही ऐकायला मिळत नाही. काहींना वारेमाप प्रसिद्धी दिली जाते, तर काही दुर्लक्षित ठेवल्या जातात. पण अशा सर्व घटना नंतर कोडे सोडवावे किंवा जुळवावे; तशा एकत्रित गुंफ़ल्या जात असतात. तशीच मुंबई हल्ल्याची घटना वा गुजरातच्या सोहराबुद्दीन इशरतच्या चकमकींची कहाणी आहे. खरेतर मुळ महाकथारचनेची ही सगळी लहानमोठी उपकथानके असतात. त्यातली प्रत्येक घटना एकाच मोठ्या कारस्थानाचा भाग असतो. त्यातून काही एक चित्र वा कथानक रंगवायचे असते. त्यात ठरवलेल्या घटना घडवल्या जातात आणि त्याचा खुप गाजावाजाही केला जातो. पण त्यात काही त्रुटी निर्माण झाल्या वा राहिल्या, मग अन्य कुठल्याही घटना त्यात घुसवून कथानक पुर्ण करण्याचीही तारांबळ उडत असते. चित्रपट वा कादंबरी लेखकाला हवी तशी कथानक वळवण्याची वाकवण्याची मुभा असते. कारण त्यातले काही वास्तव नसते, किंवा कुठल्या कोर्टात कायद्याच्या कसोटीवर सिद्धही करायची गरज नसते. त्यामुळे अतर्क्य वा बेछूट काहीही घटनाक्रम रंगवता येतो, किंवा रेटून नेता येत असतो. वास्तव जगात त्याची मोकळीक नसते. कारण घडवलेल्या कारस्थानी घटनांत सुसुत्रता व तर्कसंगती सिद्ध करावी लागत असते. तिथे मग इवलीशी चुक कारस्थान शिजवणार्‍यांची कोंडी करीत असते. मग त्यांना धडधडीत खोटेपणा करावा लागतो वा खोटेनाटे साक्षीपुरावे निर्माण करावे लागत असतात. तेही मग अशा व्यापक कटाचा भाग म्हणून शिजवावे किंवा उत्पादन करावे लागत असतात. मागल्या दोन दशकात भारतातील राजकीय घटनाक्रम बारकाईने अभ्यासला तर कुमार केतकर म्हणतात, तशा व्यापक कटकारस्थानाचे अनेक धागेदोरे जागोजागी सापडू लागतात.

मध्यंतरी एका कार्यक्रमात भाग घेताना ज्येष्ठ संपादक लेखक कुमार केतकर यांनी मागल्या चार दशकात भारतामध्ये व प्रामुख्याने आशियातील अनेक घडामोडी या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय वा जागतिक कारस्थानाचे भाग असल्याचे विधान केलेले होते. त्यात इंदिरा हत्या, राजीव हत्या, इथपासून बांगलादेशातील शेख मुजीबूर रहमान अशा मोठ्या नेत्यांची हत्याकांडे आणि गुजरातचे नगण्य गृहराज्यमंत्री हरीन पंड्या यांच्या खुनापर्यंतचे प्रसंग जोडलेले होते. अशा सर्व कथानकाचा एक महत्वाचा भाग किंवा पहिला अंक म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याचा उल्लेख केलेला होता. त्यांना असे म्हणायचे होते, की मुळ नाटकाची संहिता चार दशके आधीच तयार केलेली होती आणि त्याचा पहिला प्रयोग वा अंक नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान होण्याने झाला. पण त्यातल्या अनेक घटना कुठूनही मोदींच्या राजकारण प्रवेश किंवा पंतप्रधान होण्याशी अजिबात जुळणार्‍या नाहीत. मात्र मोदींचे मुख्यमंत्री होणे किंवा त्यांना पुढल्या काळात मिळत गेलेली लोकप्रियता, यांच्याशी त्यापैकी अनेक घटना जुळू शकतात वा जोडता येतात. त्यांची तर्कसंगत मांडणी केल्यास त्यातले कारस्थान लपून रहात नाही. मात्र त्यातला पहिला अंक मोदींच्या पंतप्रधान होण्याशी सबंधित नसून, सोनिया गांधींच्या भारतीय पंतप्रधानाची सुन होण्याशी जुळणरा असतो आणि थेट त्यांच्याच हाती देशाची राजसत्तेची सुत्रे जाण्य़ाशी नेमका सुसंगत जुळत जातो. अनेक हत्याकांडे, विविध भ्रष्टाचार, मोठमोठे घोटाळे आणि त्यात आडवे येणार्‍यांना खोट्यानाट्या आरोपांखाली विविध खटल्यात गुंतवणे; अशा अनेक घटनांमागे कुठलेतरी एकच व्यापक षदयंत्र असावे, अशी तर्कसंगत मांडणी अनेक घटनांना जोडून करता येऊ शकते. काही घटना तर फ़ारशा जोडून दाखवण्याचीही गरज नाही, इतके त्यातले परस्पर संबंध साध्या डोळ्यांनाही दिसू शकतात. त्यातले लाभार्थी वा त्यातले पिडीत बघितले, तरी त्यातले कारस्थान लपून रहात नाही. किंबहूना व्यापक कट कारस्थान म्हणून अभ्यास करायचा असेल, तर सोनियांच्या भारताचे नागरिकत्व घेण्यापासून सुरूवात करावी लागेल. योगायोग असा, की कुमार केतकर नेमका तोच कालखंड सांगतात व काही घटना बरोबर सांगतात. पण त्या तर्कसंगत मुक्कामाला पोहोचू नयेत म्हणून विनाकारण त्यात भेसळ करीत दिशाभूलही करून टाकतात. हे धागेदोरे म्हणूनच तपासून व सुसंगत मांडून तपासण्याची गरज आहे.

आता यातला माझ्या वाट्याला आलेला योगायोग असा, की कुमार केतकर यांच्या व्यापक कारस्थानाची कहाणी आधी कानी पडली आणि अवघ्या दोन आठवड्याच्या अंतरामध्ये मला एका पुस्तक प्रकाशन समारंभाचे आमंत्रण मिळाले. हे पुस्तक मराठीतले असले तरी ते भाषांतरीत आहे. अरुण करमरकर यांचे हे पुस्तक मुळातच आरव्हीएस मणि या भारत सरकारच्या ज्येष्ठ निवृत्त अधिकार्‍याने आपले काम अनुभव आणि वाट्याला आलेला छळवाद, यांच्या आधारावर पुराव्यानिशी लिहीलेले आहे. त्याचा इन्कार कोणा सोनिय सहयोग्याने वा तात्कालीन वरिष्ठ अधिकार्‍याने केलेला नसावा, हा नक्की योगायोग नाही. मणि कोणी नुसत्या फ़ायली पुढे सरकवणारा अधिकारी सामान्य नाही, तर इशरत जहान वा सोहराबुद्दीन अशा गाजलेल्या प्रकरणाच्या तपासकाम व वादविवादात सरकारची बाजू हाताळणारा महत्वाचा अधिकारी होता. ही प्रकरणे त्याच्याच काळात घडलेली आणि त्या विषयातली बहुतांश कागदपत्रे त्याने तयार केलेली वा अभ्यासून अहवाल बनवलेली आहेत. त्यामुळेच त्यात तात्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील, चिदंबरम वा सुशिलकुमार शिंदे यांच्यापेक्षाही मणि यांना त्यातला बारीकसारीक तपशील नेमका ठाऊक आहे. त्यांनीच तो हाताळलेला आहे. सहाजिकच अन्य कुणापेक्षाही त्या बाबतीत मणि यांच्या शब्दावर अधिक विश्वास ठेवता येतो. प्रामुख्याने ज्या गुप्तचर खात्याच्या अहवाल व कागदपत्रे यांच्या आधारावर सरकार आपल्या भूमिका घेते वा धोरणे निश्चीत करते, त्यावर मणि यांचा हात फ़िरवल्याशिवाय ती मंत्र्यांकडे जात नव्हती. अशा मोक्याच्या जागी हा अधिकारी बसलेला होता. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे, हिंदू दहशतवाद नावाचे जे व्यापक कारस्थान २००८ नंतर देशाच्या गळ्यात मारण्याचा कुटील प्रयास झाला, त्याच काळात त्या मोक्याच्या जागी मणि बसलेले होते आणि केतकर म्हणतात, त्या व्यापक कटाच्या शिजण्यापासून नासून त्याची दुर्गंधी सुटण्यापर्यंत मणि हे गृहस्थ मोक्याच्या जागी बसलेले होते. आपल्या तळहाताच्या रेषांप्रमाणे त्यांना या कारस्थानाचे तपशील तोंडपाठ आहेत. त्यांनी निवृत्तीनंतर ते अनुभव देशाच्या जनतेसाठी ग्रथीत करून ठेवलेले आहेत. त्याच Hindu Terror: Insider account of Ministry of Home Affairs 2006-2010 पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन होते आणि मला तिथे व्यक्तीगत मणि यांची भेट मिळू शकली. कुमार केतकर म्हणतात, त्या व्यापक कटाचा हा सगळ्यात मोठा व प्रमुख साक्षिदारच मानावा लागेल

याच कार्यक्रमाला मणि उपस्थित होते आणि तिथे भाषण करताना त्यांनी खुलेआम एक गोष्ट सांगून टाकली. ती केतकरांच्या कारस्थान शंकेला पुष्टी देणारीच होती व आहे. या माणसाला त्याच्या कामानिमीत्त ज्या गोष्टी ठाऊक होत्या वा आहेत, त्याविषयी तो ठाम होता व राहिला. म्हणून एकूण व्यापक कटकारस्थानाच्या पर्दाफ़ाश होऊ शकत होता. केतकर नेमके त्या बाबतीत मौन धारण करतात किंवा कारस्थानाचा चेहरा बदलून हिंदूत्वाचा मुखवटा चढवण्याची चलाखी करतात. अनेकदा चतुराई करताना अशी चुक होत असते. कारण माणूस बेसावध सत्य बोलून जातो आणि चुक लक्षात आल्यावर त्याला सारवासारव करण्या़ची नामुष्की येते. इथे केतकरांनी भारताला कब्जात घ्यायला परदेशी शक्तींनी रचलेल्या कारस्थानाचा उल्लेख नेमका केला, तो करायला नको होता. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीने संघ वा भाजपासह हिंदूत्ववादी शक्ती व संघटनांवर तो आरोप करून टाकला असता, तर संशयाला कुठेही जागा नव्हती. बौद्धिक विवरण म्हणून नेहमीप्रमाणे त्यांची लबाडी खपून गेली असती. सोनिया गांधींच्या हातात भारताची सत्तासुत्रे आणण्याचे कारस्थान गुलदस्त्यात ठेवता आले असते. पण आपल्या जागतिक व्यासंग व ज्ञानाचे प्रदर्शन मांडण्याच्या हव्यासाने केतकरांचा घात केला आणि त्यांनी तीनचार दशकांच्या परदेशी शक्तींच्या कारस्थानाचा उल्लेख करून टाकला. पण त्याचा उहापोह करताना संशयाचे बोट सोनियांकडे आपोआप जाणार असे दिसताच, पलटी मारून नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याने त्या नाट्याचा पहिला अंक लिहीला गेल्याची कोलांटी उडीही मारून घेतली. वास्तवात १९८० साली संजय गांधी यांच्या आकस्मिक मृत्यूपासून ह्या कारस्थानाची आंमलबजावणी सुरू झाली आणि त्याची पुर्तता सोनियांच्या नेतृत्वाखाली २००४ सालात देशाची सत्ता कॉग्रेसच्या हाती जाण्यातून झाली. त्या यशस्वी कारस्थानाला उध्वस्त करण्याची क्षमता असलेला एकच नेता देशात शिल्लक होता आणि म्हणूनच मग त्या व्यापक कटाला पुरवणी म्हणून एक आणखी कारस्थान शिजले. युपीएच्या दहा वर्षाच्या काळात त्याचीच अंमलबजावणी जोरात सुरू होती. अवघी भारत सरकारची यंत्रणा त्याच कामाला जुंपण्यात आली. त्याच करस्थानाच्या अंमलबजाव्णीत मणिसारख्या मुठभर अधिकार्‍यांनी बाधा आणली. अन्यथा देशात सत्तांतर झाले नसते आणि एव्हाना भारत नावाचा देश कितपत स्वतंत्र्य सार्वभौम राहिला असता याची शंकाच आहे. त्याची साक्ष सदरहू प्रकाशन समारंभात बोलताना मणि यांनीच दिली. सीबीआयचा ससेमिरा त्यांच्या मागे लावण्यात आला, कर्नल पुरोहित यांना मालेगाव स्फ़ोटात गोवण्यात आले. लष्करप्रमुख व्ही के सिंग यांना हाकलण्याचे डाव खेळले गेले. गुजरातचे अनेक अधिकारी गजाआड ढकलेले गेले. यातला शेवटचा अंक होता नरेंद्र मोदी. तो नाटकाचा पहिला अंक नव्हता, तर अखेरचा अंक होता. नाटक फ़सल्याने घडलेला योगायोग होता. मूळ कारस्थानाच्या पटकथेत नसलेला आकस्मिक योगायोग होता.

ततो योगायोग भारतीय जनतेने घडवून आणला नसता तर? कारस्थान यशस्वी होऊन त्यात सोनिया व अन्य युपीएचे हस्तक दलाल विजयी झाले असते. आजही त्यांचीच सत्ता कायम राहिली असती आणि भारतावर चीन पाकिस्तानही राज्य करताना आपण बघू शकलो असतो. कारण त्या नाटकाच्या अखेरच्या अंकात नरेंद्र मोदी व अमित शहांना तुरूंगात डांबून तो राजकीय अडथळाही संपवायची संपुर्ण योजना सज्ज होती. त्यात अडथळा एकाच व्यक्तीचा होता, त्याचे नाव मणि. आरव्हीएस मणि. जे त्या काळात केंद्राच्या गृहमंत्रालयात मोक्याच्या जागी अवर सचिव म्हणून कार्यरत होते आणि इशरत व सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात मोदी व शहांना गुंतवून देणारी कागदपत्रे त्यांनीच तयार करावीत, असा दबाव त्यांच्यावर आणला गेला होता. ‘त्या दोघांना चकमकीत गुंतवून द्या’ असा लकडा मणिंकडे लावला गेला होता. तसा मॅडमचा आदेश आहे आणि त्याच्या बदल्यात मणिंना हवे ते द्यायला तेव्हाचे युपीए सत्ताधीश तयार होते. चिदंबरम यांच्यापासून प्रत्येक वरीष्ठाने दबाव आणलेला होता. पण मणि त्याला दाद देईनात, तेव्हा त्यांना सीबीआय कोठडीत डांबून वा एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे त्यांच्या घर कुटुंबाला छळून दडपण आणले गेले, आपल्याच घरात मुलाचा चाललेला छळ बघून मणिंची आई हाय खावून मरण पावली. देशातले दिग्गज नेते मंत्री शिजलेल्या कारस्थानानुसार मॅडमसमोर आपल्या शेपट्या हलवित होते आणि एक मणि नावाचा केंद्रातील दुसर्‍या फ़ळीतला अधिकारी दाद देत नव्हता. तिथे सगळ्या व्यापक कटाला खिंडार पडत गेले. त्या कारस्थानाचा शेवटचा अंक मोदी पंतप्रधान होण्यातून फ़सला आणि एकामागून एक कारस्थानाचा रचलेला मनोरा ढासळत गेला. अशी कारस्थाने रचणारे आणि त्यांना देशाशी गद्दारी करून साथ देणारेही भारतीय आहेत. पण तसेच असल्या कारस्थानांना उध्वस्त करणार्‍यांच्या पाठीशी योग्य वेळी उभे रहाणारेही करोडो सामान्य भारतीय आहेत. ती भारतीयांची उपजत वृत्ती आहे. म्हणूनच त्यांनाही यातले कारस्थान समजावणे भाग आहे. मग पुन्हा इतक्या सहजतेने कोणी कारस्थान रचू शकणार नाहीत आणि ते ओळखण्याची दृष्टी इथल्या नागरिकांना येऊ शकेल आणि केतकरांसारखे बुद्धीजिवी उजळमाथ्याने दिशाभूल करायला धजावणार नाहीत. हे कारस्थान काय आहे आणि त्याचे धागेदोरे कुठवर पसरलेले आहेत? येत्या काही प्रकरणातून त्याचाच उलगडा करायचा आहे. (क्रमश:)

21 comments:

  1. Bhau,

    Mazi Bhiti Kharich Tharali :-

    तो योगायोग भारतीय जनतेने घडवून आणला नसता तर? कारस्थान यशस्वी होऊन त्यात सोनिया व अन्य युपीएचे हस्तक दलाल विजयी झाले असते. आजही त्यांचीच सत्ता कायम राहिली असती आणि भारतावर चीन पाकिस्तानही राज्य करताना आपण बघू शकलो असतो.

    Aaplya Varil Utaryapramane Nakkich Zale Asate Jar Modi 2014 La Nivdun Aale Nasate Tar. He Mi Varanvar Aamachya Garguti Rajkiya Charchet Mandat Hoto. Karan UPA Va Tyanchya Mhorkyanchi Lakshane Tashich Disat Hoti Yat Kahich Sanka Nahi.

    Tasech Tya Vyapak Katacha / Yojanecha Bhag Mhanunach RAFAEL VIMANE Bhartat Yeuch Nayet Va Bhartiya Vaudal Saksham Hou Naye Ase Vatanarech Tyamadhye Roda Ghalat Aahet. He Aahet Pakistan Ani ChinaChe DEEP ASSETS.

    Modinni Kelelya Notabandimule Tya Deep Assets Var Kahi Pramanat Upasmarichi Vel Aali Aahe Mhanun Notobandi Vagere Failure Aahe Ase Midia Va Tatsam Lokankadun Aapprachar Suru Aahe.

    Ekandaritach Sagale Bhayanak Rajkaran Chalale Aahe Aajachya Virodhi Pakshanche.

    Itkya Ughadpane Lihilyabaddal Dhanyavad.

    ReplyDelete
  2. At least tumchi hi series tari Hindi ani English donhi madhun yayli havi bhau.
    Fakt Marathi Manu's jagruk noun chalnar nahi sampurna bhartiya nagrik Java zala pahij.

    ReplyDelete
  3. अतिशय छान भाऊ. पन या कटाचे सूत्रधार आणि सगळे धागेदोरे इतक्या स्पष्ठ पने खुले होऊन सुधा दोषी लोकांना अटक सोडा पन साधी चौकशी सुद्धा का होत नाही ? प्रश्न मोदी किंवा बीजेपी चा नसून राष्ट्रीय सुरक्षेचा आहे!

    ReplyDelete
  4. नमस्ते भाऊ, हे पुस्तक कुठे कसे उपलब्ध होईल?

    ReplyDelete
    Replies
    1. Morayaprakashan.com वर तांत्रिक अडचण येते. त्यापेक्षा bookganga.com वर हे पुस्तक उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे UPI Address दैऊन भिम अॅपमधून पैसे चुकते करता येतात. त्यामुळे आपल्या कार्डाचा तपशील शेअर करायला लागत नाही. मला पुण्यात ह्या पुस्तकाचे कुरीअर खर्चासकट १०४.९० पैसे पडले.

      Delete
  5. फारच भयानक आहे.अंगावर काटा आला.

    ReplyDelete
  6. श्री भाऊ हे फारच भयानक आहे

    ReplyDelete
  7. Even today it is getting implemented through may be by Cambridge Analytica.

    ReplyDelete
  8. सोशल मीडिया वर मक्तेदारी असलेले गुगल, त्यांच्या युट्यूब या वेबसाईटवर, The Accidental Prime minister या सिनेमाच्या ट्रेलर ला shadow banning करत आहेत. युट्यूब वर सर्च केल्यावर हा ट्रेलर दिसतच नव्हता.
    हे काही नवीन नाही. गुगल, फेसबुक, ट्विटर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे जनमत बदलण्यासाठी काम करत आहेत.

    ReplyDelete
  9. मणी यांच्यासारख्या अधिकाऱ्याची राष्ट्रनिष्ठा खरोखरंच वाखाणण्याजोगी आहे. देशाला एका मोठ्या खोल गर्तेत ढकलण्यापासून वाचवण्यात त्यांची खरंच मोलाची भूमिका आहे असं म्हणावं लागेल.

    ReplyDelete
  10. Eagerly waiting for next episodes to be unfolded

    ReplyDelete
  11. see what amazon website says about english copy of this book.
    "Currently unavailable
    We don't know when or if this item will be back in stock."

    ReplyDelete
  12. This is very shocking. Eagerly waiting for next blog on the subject.

    ReplyDelete
  13. मोदीजी पुन्हा मेजोरीटी ने आले नाहीत तर फार मोठा अनर्थ होईल,पण मोदी द्वेष्ट्या हिंदू पक्षोपक्षाना कळत नाही,हे भारताचे दुर्दैव म्हणजे इंग्रज गेले आता इटालियन,

    ReplyDelete
  14. याचा पुढचा भाग कधी येणार?

    ReplyDelete
  15. खूप मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होतो आहे..

    ReplyDelete
  16. Awaiting next episodes of ketkar & RVs mani

    ReplyDelete
  17. सर्व गोष्टी ला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली पाहिजे तरच सर्व जनमानसाचा संभ्रम दुर होईल

    ReplyDelete
  18. ya saryanchi itaki vait awastha houn deshasamor tyanchi karasthane yeun te halhal houn mele pahijet.. tar deshachya janatecha vishwas basel ki aaplya karmanchi fale yach janmat bhogavi lagtat.. vyaktigat swarthasathi deshala vikayla nighalelya, dharmala kalankit karu pahnaryanna shiksha hi vhaylach havi ani ti suddha deshachya nyayalayanech dyayla havi.. lavkarat lavkar

    ReplyDelete