Monday, August 29, 2016

‘आम्ही सारे’ मेणबत्त्या विझवून कुठे जातो?




ओडीशा नावाचे एक राज्य आपल्या भारतात आहे. ते स्वातंत्र्योत्तर काळात एकाच गोष्टीसाठी प्रकाशझोतात राहिले आहे. ते कारण म्हणजे तिथली अतोनात गरीबी! मग त्यात उपासमारीने कुपोषणाने होणारे बालमृत्यू असोत किंवा बेरोजगारीने होणारे स्थलांतर असो. यापेक्षा अन्य कुठल्या कारणाने ओडीशाचे नाव इतर भारतीयांना ऐकायला मिळत नाही. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की जगभर प्रसिद्ध असलेल्या जगन्नाथपुरीच्या रथयात्रेनेही ओडीशा जगभर परिचीत आहे. अशा राज्यातील कालाहंडी नावाचा जिल्हा अशा दुर्दशेसाठीच ओळखला जातो. पन्नास वर्षे उलटून गेली असतील. कालाहंडी त्या दुर्दशेतून बाहेर पडू न शकलेला प्रदेश आहे. गेल्या आठवड्यात पुन्हा कालाहंडीचा उल्लेख बातम्यातून आला, तो दुर्दशेचे नवे स्वरूप सांगणारा होता. दाना मांझी नावाच्या एका पतीची ही गोष्ट आहे. त्याच्या पत्नीवर क्षयाच्या रोगासाठी उपचार चालू होते. त्यातून ती बरी होऊ शकली नाही आणि तिचा मृत्यू झाला. मग तिचा मृतदेह माघारी आपल्या गावी घेऊन जाण्याची चिंता त्याला सतावत होती. गमावलेल्या पत्नीचे आपल्या आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार व्हावेत, इतकीच त्याची अपेक्षा होती. पण इस्पितळापासून त्याचे गाव पन्नास किलोमिटर्सपेक्षा अधिक दूर होते आणि इतके दूर जाण्यासाठी रुग्णवाहिका किंवा शववाहिनीची व्यवस्था करण्याइतकी मांझीची ऐपत नव्हती. म्हणून त्याने सदरहू इस्पितळाच्या अधिकार्‍यांकडे खुप गयावया केल्या. पण उपयोग झाला नाही. अखेरीस तो मृतदेह एका कपड्यात गुंडाळून, ते ओझे खांद्यावर घेऊन त्याने पदयात्रा सुरू केली. तब्बल दहा किलोमिटर्स अंतरापर्यंतचा रस्ता पुर्ण केल्यावर कुणा पत्रकाराला ही ‘अंत्ययात्रा’ नजरेत भरली आणि त्याने थेट जिल्हाधिकार्‍यांना फ़ोन करून ही माहिती दिली. त्यांनी हालचाल केल्यावर पुढली ‘यात्रा सुखरूप’ पार पडली. दरम्यान त्या पत्रकाराने त्या ‘यात्रेचे’ चित्रण करून त्याला वाचा फ़ोडली.

हे चित्रण बघणार्‍या कुणाच्याही हृदयाला हादरे बसले तर नवल नाही. पण हे हादरे बसणारी हृदये किंवा थरारून जाणारी मने, कधी रस्त्यावर किंवा घटनास्थळी नसतात, हे आपल्या देशाचे व समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव असते. ही अशी संवेदनाशील मने व हृदये असलेली माणसे नेहमी आपापल्या सुखरूप आलिशान घरात बसलेली असतात. त्यांच्या मनावर शहारे आणण्यासाठी तशी चित्रणे करून त्याचे प्रक्षेपण होणे अगत्याचे असते. तेव्हाच त्यांच्यातली न्यायबुद्धी व अन्यायाची चीड सरसरून उफ़ाळून येते. ते तावातावाने देशातल्या गरीबीविषयी किंवा निकामी झालेल्या शासकीय व्यवस्थेविषयी आवाज उठवू लागतात. मग असे लोक जमून ‘आम्ही सारे’ न्यायाचे वारकरी असल्याचे दाखवायला जमू लागतात. पण त्यातला कोणीही प्रत्यक्ष घटना घडते तेव्हा तिथे नसतो, ही खरी समस्या आहे. अशा तमाम ‘आम्ही सारे’ सैनिक व लढवय्यांची खासियत ही असते, की त्यांना समोर घडणारा अन्याय, अत्याचार किंवा दु:ख दैन्य साध्या डोळ्यांनी दिसत नाही, की बघता येत नाही. तो अन्याय अत्याचार माध्यमातून त्यांच्या नजरेस आणून देण्याची गरज असते. हे माध्यम नसेल, तिथे त्यांना समोरचा अन्याय गुन्हाही बघता येत नाही. त्यासाठी आवश्यक असलेले जागरूक डोळे त्यांच्यापाशी नसतात, किंवा असलेच तरी त्यामुळे दिसणार्‍या अन्याय अत्याचाराने विचलीत होऊन पुढाकार घेण्याची संवेदनशीलता त्या ‘आम्ही सारे’ लोकांपाशी नसते. सहाजिकच अन्याय होऊन गेल्यानंतर त्यांची हालचाल सुरू होते. दाना मांझीच्या पत्नीचा मृतदेह त्याने दहा किलोमिटर्स वाहून आणला. तो सगळा रस्ता निर्मनुष्य निर्जन होता काय? त्या पट्ट्यात कोणीही संवेदनाशील माणुस नव्हता काय? असेल कोणी तर त्याच्यापाशी संवेदनाशील मनाचा अभाव होता काय? मग तेव्हा अवघा देश काय करीत होता?

रोज आपण वृत्तवाहिन्यांवरील बातम्या किंवा चर्चा ऐकतो, तेव्हा तिथले निवेदक बुद्धीमंत काय बोलतात? अवघा देश बघतो-ऐकतो आहे. मग हा अवघा देश त्या दहा किलोमिटर्सच्या रस्त्यावर गाढ झोपलेला होता काय? की तो दहा किलोमिटर्सचा रस्ता भारत नावाच्या देशाचा हिस्साच नसतो? त्या रस्त्याने वावरणारे भलेबुरे लोक भारतीय नागरिक नसतात, की भारत नावाच्या देशाचे घटक नसतात? जर तेही भारतीय असतील तर त्यांनी प्रतिक्रीया वा प्रतिसाद द्यायला हवा होता. एक इस्पितळ वा तिथले अधिकारी कर्मचारी नालायक असतील. पण या दहा किलोमिटर्स रस्त्यावरून मांझी त्या मृतदेहाचे ओझे पेलून चालत होता, तेव्हा त्याच्या आजूबाजूने जाणारे किमान दोनचारशे तरी सामान्य नागरीक असतीलच ना? त्यापैकी कोणालाही त्याची दया कींव कशाला आली नाही? माणुस म्हणून त्याच्या वेदना यातनामध्ये मदतीचा हात देण्याची बुद्धी यापैकी कोणालाच कशी झाली नाही? अवघा देश बघत असतो, तेव्हाही तो प्रत्येक घटनेकडे तितकाच बधीरपणे बघत असतो, याचीच ही साक्ष आहे. ते बघणार्‍याला समोर घडते त्याच्याशी कर्तव्य नसते. जोवर आपल्या अंगाला झळ लागत नाही, तोपर्यंत आपण सगळेच अगदी अलिप्त असतो आणि होऊन गेल्यावर अश्रू ढाळण्यासाठी गर्दी करीत असतो. मग मांझीने पत्नीचा निर्जीव मृतदेह वाहून नेण्याची घटना असो किंवा कुणा मारेकर्‍याने दाभोळकर पानसरेंना गोळ्या घालण्याचा प्रसंग असो. आपण तिकडे पाठ फ़िरवून आपली कातडी बचावण्यासाठी पळ काढत असतो. सर्वकाही शांत झाले मग ‘आम्ही सारे’ मेणबत्त्या पेटवून सण साजरा करायला एकत्र जमतो. इथे कोणी मांझीच्या पत्नीला खांदा द्यायला पुढे येत नाही. तर तिकडे पानसरे दाभोळकरांवर झाडल्या जाणार्‍या गोळीला रोखण्यासाठी पुढाकार घेत नाही. प्रत्येकजण अशावेळी सोयीस्करपणे आडोसा शोधून दडी मारत असतो. धोका संपल्यावर व्यवस्थेला दोष द्यायला मात्र हिरीरीने पुढे सरसावत असतो.

थोडा वेळ मांझीचा विषय बाजूला ठेवा. दाभोळकर पानसरे यांच्या हत्याकांडाचा विषय बघा. कुठल्याही मुलीच्या अंगावर असिड टाकून पळणारा गुंड डोळ्यासमोर आणा. तरूणीवर वा अन्य कुणावर चाकूहल्ला करून निसटणारा आपल्यापासून दुर नसतो. बातमीतला नसतो. त्याक्षणी जवळपास कोणी पोलिस वा कायद्याचा अंमलदार नसतो. अशावेळी पहिली कृती जबाबदार नागरिकाने करायची असते. राज्यघटनेने नागरिक म्हणून जसा अधिकार दिला आहे, तशीच सहनागरिकांच्याही बाबतीत जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. जिथे पोलिस वा कायदा प्रशासनाचा कोणी उपस्थित नसेल, तिथे देशाचा नागरिक म्हणून गरजूला वा पिडीताला मदतीचा हात द्यायला पुढे सरसावण्याची ती जबाबदारी असते. दहा किलोमिटर्स चालणार्‍या दाना मांझीला तसा एकही जबाबदार भारतीय नागरिक भेटला नाही. कोणाला त्याच्या पिडेविषयी कुठली आस्था वाटली नाही. कुणाला त्याची दया आली नाही. पण तशीच त्यापैकी कुणाला ती आपली जबाबदारीही वाटली नाही. ती जबाबदारी कुणाचीच नसेल तर मेणबत्त्या पेटवून वा फ़लक झळकवून ‘आम्ही सारे’ कुठली जबाबदारी पार पाडत असतो? निदर्शनाचा अधिकार तेव्हाच मिळतो, जेव्हा जबाबदारीचे ओझे उचलण्याचे कर्तव्य पार पाडलेले असते. त्या कर्तव्याकडे पाठ फ़िरवणार्‍यांना इतर कोणाच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवण्याचा अधिकार तरी असतो काय? चॅरीटी बिगीन्स एट होम अशी इंग्रजी उक्ती आहे. इतर कुणी वा सरकारकडून कर्तव्याचे पालन व्हावे अशी अपेक्षा बाळगणार्‍यांनी आधी आपण कर्तव्यदक्ष असायला हवे. ते कर्तव्य मेणबत्त्यांची रोषणाई सादर करायचे नसून असे आसपासचे दाना मांझी असतात, त्याच्या मदतीला धाव घेण्याचे असते. तेव्हा ‘आम्ही सारे’ मेणबत्त्या विझवून सुरक्षित बिळात दडी मारून बसत असतो. व्यवस्था वा सरकारसह अन्य कुणाला जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला शिल्लक उरतो काय?

रोजनिशी  ३०/८/२०१६  (दै, जनशक्ति)


4 comments:

  1. भाऊ पुर्णपणे सहमत.
    👍👍👌

    ReplyDelete
  2. Sir you have written completely perfect situation. But now a days people don't dare to help unknown person, as they look at this suspiciously & this is based on past experience or experience shared by friends & relatives. So such unique activities can not be the criteria to judge entire community. This time I do not agree with your views.

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Sir
      You have made a point but whatever bhau has said u r unable to interpret as now u see only oppotunist andolak they run specific agenda. Media and such andolaks are running hidden agenda for that they are hand in hand and certain political parties take benifits of such incidences & remail in pOwer for decades. The main purpose is to affect your thinking about the govt. machinery & the govt. in power & be biased about it so as to you feel such govt. machineries are usless.
      And more become resident non Indian as we stay in lodge. Once such middle class citizens are indifferent they quitters of main streem of nation and once your thinking power is affected u go on commenting in general public about our govt. nation. This is actally wanted by such foreign funded media. All these years all of us see the andolaks like Medha Patkar Indira Jaising Tista Setalewad were doing through funding by NGOS. They hampered the developmental activities only & not interested in giving justice to affected on large scale. They grown up by small examples of giving justice to small incidences and funded by specific NGOs become promoted by media and decade ruling party of country & become national Hero.(Anna Harare Medha Patkar etc)
      They selected such andolak leaders who will be loyal to such party & they supported only to specific party & once such party is out of power they build andolan against such Govts. The agenda is to not only defame but not allow to do good/developmental work and affect the performance of such unexperienced opposition party govt. with media hand in hand.
      They also fought to loose you faith on Dharma/social system more particularly Hindus once you loose such faith the persons become selfish or routhless ready to work anti nation/community.
      This is they want and u will see so called 'Amhi Sare' are such community how want to all of us become part of such things.
      We are fortunate person like Bhau is boldly writing and bringing truth to our knowledge.
      But as expressed by me earlier we are representing the same Hindustani as were thousands of year ago when Ram become king after deafiting Ravana even he become victim and has to send Seeta to Ashram and his sons taken birth their and had to fight war against his father. If Ram has to go through this who are us / now Modiji facing same challange.
      Regards.
      Amool

      Delete
  3. भाऊ मान्य बरोबर आहे..

    ReplyDelete