Wednesday, August 24, 2016

यादवी युद्धाची चाहुल

french jihad के लिए चित्र परिणाम

फ़्रान्स हा सेक्युलर देश आहे आणि तिथे कुणाही नागरिकाची धर्मानुसार नोंदणी होत नाही. म्हणूनच धर्मपालनाचे स्वातंत्र्य असले तरी धर्माचे अवडंबर माजवण्याची मुभा नाही. म्हणून मग कुणाला धर्माचा मुखवटा पांघरून दहशतवाद माजवण्याचेही स्वातंत्र्य घेता येत नाही. तरीही तिथे जिहाद थांबलेला नाही. जे उपलब्ध स्वातंत्र्य व मोकळीक आहे, त्याचा लाभ उठवून उच्छाद मांडणे; हीच तर जिहादी रणनिती असते. म्हणून आजवर फ़्रेंच वसाहतीतून आलेल्या मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात फ़्रान्सने आश्रय दिला व नागरिकत्वही दिले. मात्र म्हणून त्या आश्रितांना आपल्या धर्माचा आग्रह सोडणे शक्य झालेले नाही. परिणामी वारंवार फ़्रान्सला जिहादी दहशतवादाचे शिकार व्हावे लागले आहे. पण अन्य देशांपेक्षा फ़्रान्समध्ये एक सुविधा चांगली आहे. धर्मपालनाचे स्वातंत्र्य असले, तरी त्या धर्माला जाहिरपणे राजकीय हेतूने वापरण्याची मुभा नाही. सहाजिकच मुस्लिमांनाही फ़्रान्समध्ये कुठलेही चोचले करून घेता येत नाहीत. त्याचा फ़ायदा तिथे कठोर कायदे राबवताना होऊ शकतो. आताही तेच झाले आहे. मागल्या नोव्हेंबर महिन्यात तिथे मोठे घातपात होऊन सव्वाशे लोकांचा बळी गेल्यावर कठोर कारवाया सुरू झाल्या. त्या करताना जिहादचे जन्मस्थान असलेल्या मशिदी व इस्लामी धर्मस्थानी लागोपाठ धाडी घातल्या गेल्या. त्याच्या फ़ारशा बातम्या इथे कुठे आलेल्या नाहीत. पण इस्लामचा वा धर्माचा आडोसा घेऊन कोणी त्या धाडींना रोखू शकलेला नाही. आठ महिन्यात जवळपास २०० मशिदीवर धाडी घातल्या गेल्या आणि शेकड्यांनी मुल्लामौलवींची धरपकड करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात लॅग्नी मार्ने शहरातील मशिदीवर धाड घातली असता, प्रचंड प्रमाणात रायफ़लचा दारूगोळा साठवून ठेवलेला आढळला. युरोपियन राष्ट्रांमध्ये फ़्रान्स हा सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. म्हणूनच त्याच्या कृतीला महत्व आहे.

युरोपियन महासंघाने सिरीयातून आलेल्या निर्वासितांना परागंदा म्हणून मोठ्या प्रमाणात आश्रय देण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला होता. वास्तविक तेव्हाच सावधान रहाण्याची गरज होती. प्रामुख्याने रशियाने हवाई हल्ले सुरू केल्यावर सिरीयन निर्वासितांचे लोंढे सुरू झाले आणि तेव्हाच इसिसने आपलेही अनेक हस्तक त्यातूनच युरोपला रवाना केल्याचा इशारा दिलेला होता. कुठलेही कागदपत्र न तपासता, किंवा कुठलीही छाननी केल्याशिवाय हजारो निर्वासित मुस्लिमांना युरोपात घुसू देण्यात आले. त्यातले अनेकजण तर सिरीयन इराकी सुद्धा नाहीत. काहीजण अफ़गाण, पाकिस्तानीही असल्याचे निष्पन्न झाले. म्हणजेच इसिसने दिलेला इशारा खरा़च होता. पण तो धोका युरोपने पत्करला आणि तीन महिन्यात मोठा फ़टका फ़्रान्सला बॉम्बस्फ़ोट मालिकेतून भोगावा लागला. पाठोपाठ त्यातल्या आरोपींचा शोध घेताना पोलिस बेल्जमला पोहोचले आणि त्याही देशाला दणका बसला. पण पॅरीसच्या हादर्‍याने शहाणे झालेल्या फ़ेंच सरकारने जिहादी मानसितता व त्यात गुंतलेल्यांना बिळातून हुडकून काढण्याची मोहिम अखंड चालविली आहे. त्यासाठी प्रत्येक लहानमोठ्या शहरात वस्त्यांमध्ये धाडी घातल्या जात आहेत आणि प्रामुख्याने मशिदी, मुस्लिम वस्त्या पिंजून काढल्या जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर जगाचा चेहरा बदलतो आहे. अमेरिकेतही डोनाल्ड ट्रंप यांच्यासारखा जिहादींना थेट शिंगावर घायला उत्सुक असलेला नेता अध्यक्षीय उमेदवार म्हणून पुढे आला आहे. हे जगाचे रूप बदलत असल्याचे लक्षण आहे. अशी स्थिती कशामुळे आली? इस्लाम शांततेचा धर्म आहे, वगैरे पोपटपंचीला लोक कंटाळल्याचे ते लक्षण आहे. कारण वास्तवात लोकांना जिहादी हिंसाचाराचे शिकार व्हावे लागते आहे. कालपरवाच फ़्रान्सच्या नीस शहरामध्ये भरधाव ट्रक नागरिकांच्या गर्दीवर घालून एका मुस्लिमाने चाळीस निरपराधांचा जीव घेतलेला आहे.

यातली खोच लक्षात घेण्यासारखी आहे. दहशतवादाला धर्म असो किंवा नसो, जागतिक संघर्षाला पर्याय उरलेला नाही. जिहादी जो इस्लाम जगावर लादू बघत आहेत, त्यांनी तुमच्यासाठी अन्य कुठला पर्याय शिल्लक ठेवलेला नाही. तुम्हाला लढायचे आहे किंवा नाही. तुम्हाला कुठला धर्म हवा किंवा नको, हा प्रश्न नाही. सवाल तुम्हाला जगायचे आहे किंवा नाही इतकाच आहे. जगायचे असेल तर जिहादी सांगतील त्याच पद्धतीने जगावे लागेल. ते मान्य नसेल तर मरावे लागेल. त्यातूनही तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचे असेल, तर तुम्हाला जिहादींशी दोन हात करावेच लागतील. दोन हात याचा अर्थ लढाई आणि मात, असा होत नाही. जिहादींना जगायची हौस नाही. मरायला ते उतावळे झालेले आहेत. कारण मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही, अशी त्यांची पक्की धर्मश्रद्धा आहे. मात्र एकट्याने निमूट मरायला त्यांची धर्मशिकवण मान्यता देत नाही. मरताना इश्वरासाठी मरावे आणि म्हणून इश्वराला नाकारणार्‍यांना मारावे, अशी त्यांची श्रद्धा आहे. सहाजिकच त्यांनी धर्माचे पालन करायचे, तर तुम्हाला मारून टाकणे हेच त्यांचे कर्तव्य होते. म्हणजे तुमच्यासाठी त्यांना रोखण्याखेरीज अन्य मार्ग शिल्लक नाही. रोखणे म्हणजे काय? कसाब किंवा बुर्‍हान वाणीला रोखण्याचा काय प्रयत्न झाला नाही? पण त्याचा उपयोग नसतो. मरा किंवा आम्हाला ठार मारून जीवंत रहा, इतकाच पर्याय जिहादींनी शिल्लक ठेवला आहे. त्याची जाणिव जसजशी प्रभावी होते आहे, तसतसे जिहाद विरोधात जागतिक मत प्रभावी होत चालले आहे. फ़्रान्सची कठोर कारवाई व मोहिम त्यातून आली आहे आणि अमेरिकेतील डोनाल्ड ट्रंप यांची वाढती लोकप्रियता, त्याच जाणिवेचा परिणाम आहे. भारतात झाकीर नाईक विरोधात उठलेले वादळ त्याचाच परिणाम आहे. जिहादी अवघ्या जगालाच तिसर्‍या महायुद्धाकडे फ़रफ़टत घेऊन चालले आहेत.

तिसरे महायुद्ध होऊ नये म्हणून ज्या राष्ट्रसंघाची स्थापना झालेली होती, त्याच्याच पापामुळे आता तिसरे महायुद्ध व्हायला पोषक परिस्थिती निर्माण होत चालली आहे. कठोर कायद्यांनी ज्या हिंसाचाराची मुस्कटदाबी करून ठेवली होती, त्यालाच मोकाट सोडण्याचे स्वातंत्र्य राष्ट्रसंघाच्या विविध अतिरेकी कायद्यांनी देण्यात आले. त्याचाच लाभ घेत मुस्लिम मानसितेतला जिहाद उफ़ाळून आला आहे. त्यातच अशा मुस्लिम देशातील हुकूमशहांना संपवून तिथे लोकशाही रुजवण्या़चा अतिरेक झाला. त्यामुळे तिथे पोलादी टाचेखाली चेपून ठेवलेली ही जिहादी मानसिकता बंद बाटलीतल्या भुतासारखी बाहेर आली आहे. तिला ठेचून काढण्याइतकी फ़ौज प्रत्येक देशापाशी असली तरी त्यांचेच कायदे त्या फ़ौजेचे हातपाय बांधून बसलेले आहेत. परिणामी लोकांचा कायद्याने मिळणार्‍या संरक्षणावरचा विश्वास ढासळत चालला असून, यादवी युद्धाच्या कडेलोटावर अनेक देश येऊन ठेपत आहेत. युरोपात अनेक देशात तशा दंगली होत असून, दिवसेदिवस स्थनिक मुस्लिमांच्या विरोधातले वातावरण तापत चालले आहे. परिणामी जगाची विभागणी जिहादी इस्लाम विरुद्ध बाकीचे जग, अशी होत चालली आहे. त्यामुळे लौकरच जागतिक नेत्यांना आपापले कायदे व राजकीय भूमिका गुंडाळून जिहादी इस्लाम विरोधात आघाडी उघडावीच लागणार आहे. मात्र जिहादी फ़ौज एकाच कुठल्या देशात नाही, की एका प्रदेशात मुकाम ठोकून बसलेली नाही. जगातल्या प्रत्येक देशात आणी वस्तीत ही प्रवृत्ती दबा धरून बसलेली आहे. तिथे जाऊन तिचा बंदोबस्त करणे भाग आहे. ते काम पोलिस व नेहमीच्या फ़ौजेकडूनही होणे शक्य नाही. तर अशा वस्त्या व बालेकिल्ले असलेल्या जागी यादवी माजण्याची मोठी शक्यता आहे. किंबहूना नीस व ऑरलॅन्डो शहरातील घडामोडी सांगतात, की तशा यादवीची वेळ जिहादीच आणणार आहेत. काही वर्षात अवघे जग जिहादी विरुद्ध इतर अशा यादवीत ओढले जाणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

4 comments:

  1. "फैसलेका" दिन जवळ येतोय

    ReplyDelete
  2. सुनिल चंद्रात्रेAugust 25, 2016 at 8:54 PM

    माझ्यामते पण तो दिवस दूर नाही की आपण यथोचित कार्यवाई करावीच लागेल व जेवढ्या लौकर लोक जागरूक होतील तेवढ्या लौकर सर्वाना सर्वाधिक फायदा होईल

    ReplyDelete
  3. नेमक्या शब्दात एखाद्या जटिल समस्येची गणितासारखी सूत्र बद्ध मांडणी करून कोडं सोडवुन दाखवता, भाऊ तुम्ही..!

    ReplyDelete
  4. Yavar upay shodhla tar pratyek deshat islamvar bandhan ladaychach upay distoy.....

    ReplyDelete