Thursday, July 28, 2016

आपले मुल जगावेगळे कसे? (जोपासनापर्व - ६)


मी कधी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला नाही किंवा बालमानसशास्त्राचा जाणकारही नाही. पण विविध वयातल्या शेकड्यांनी मुलांचे जवळून निरीक्षण व अभ्यास, हा माझा छंद राहिलेला आहे. योगायोगाने मी त्याकडे ओढला गेलो आणि योग्यवेळी त्यातले गुरूही भेटले. माझी मुलगी अवघ्या काही महिने वयाची असताना तिच्यामध्ये काही शारिरीक दोष असल्याची शंका डॉक्टरांनी काढली आणि मला विशेषज्ञाकडे जावे लागले. माझी थोरली मेहुणी मेडीकल कॉलेजातील प्राध्यापिका. ती वैद्यक शिक्षण घेताना तिचे एक प्राध्यापक होते डॉ. एस एन लोहे. अतिशय खडूस माणूस! प्रथमच मुलीला दाखवायला गेलो असताना त्यांनी चक्क कान उपटले होते. तेव्हा त्यांचा खुप राग आला. पण आज तो योग्यवेळी भेटलेला गुरू होता, असे जाणवते. एक कुठले खास औषध त्यांनी लिहून दिले होते आणि बारा तेरा दुकाने शोधूनही ते मिळाले नाही. म्हणून तसाच पुन्हा लोह्यांना भेटलो आणि पर्यायी औषध विचारले. त्यांनी दिलेले उत्तर सर्द करणारे होते. ते म्हणाले, ‘मी लिहून दिले म्हणजे हे औषध बाजारात उपलब्ध आहे आणि तुझ्या मुलीसाठी तेच योग्य आहे. बारा दुकानात मिळाले नसेल तर शंभर दुकानात शोधायचे. पण तेच द्यायचे. तुझ्या मुलीच्या जागी दुसरी पर्यायी कुठली मुलगी आणून दिली तर घेशील का? पर्यायी मुलीचे पालनपोषण करशील का?’ काय बोलू शकत होतो? निमूट खालमानेने तिथून बाहेर पडलो आणि ३७ दुकाने पालथी घातली व ते औषध मिळवले. तेव्हा त्या डॉक्टरांचा खुप राग आला होता. पण अनवधानाने त्यांनी माझे मुल जगावेगळे असेल, तर त्यासाठी मी जगावेगळा बापही असायला हवा, याची शिकवण दिली. पत्रकार असल्याने त्यांच्या उत्तराचा अर्थ अनेक दिवस शोधत राहिलो. काही वर्षांनी तो उलगडा झाला आणि ज्याचा संताप आला होता, तोच डॉक्टर आज योग्यवेळी भेटलेला गुरू वाटतो.

आयुष्यात अशी माणसे भेटणे खुप नशीबाची गोष्ट असते. मला असे अनेक लोक अनवधानाने भेटले आणि जेव्हा भेटले तेव्हा त्यांची महत्ता उमजलीही नव्हती. पुढल्या काळात त्याचा साक्षात्कार झाला. प्रत्येक मुल कसे हाताळावे हे त्याच्या जन्मदात्यांनाच अधिक उमजले पाहिजे. मुले त्यासाठी अनेक संकेत देत असतात. आपल्याला ते संकेत ओळखता आले पाहिजेत. मुलाची जोपासना हा बोजा समजून त्याकडे बघितले, तर यातले काहीही शक्य नाही. रांगणारे मूल बसू लागते आणि उभे राहुन चालूही लागते. जितकी अशी वाढ होत असते तशीच मुलाची बौद्धिक भूकही वाढत जात असते. त्याला बोर्नव्हीटा किंवा आणखी काही पौष्टीक खायला घालून भागणार नसते. त्याच्या वाढत्या ज्ञानोपासनेची भुकही भागवण्याची गरज असते. त्यात पालक कमी पडतात, तिथून खरी समस्या सुरू होते. पायावर उभे राहू लागलेले मुल आता पुर्णपणे पालकांवर अवलंबून नसते. त्याला तुमच्या आधाराची गरज उरलेली नसते. त्यामुळे आजवर दुरून बघितलेल्या जगाला जवळून. स्पर्ध करून, समजून घेण्याच्या उर्मी प्रखर होतात. त्याच्यापासून दुर ठेवलेल्या वस्तु हाताळण्याची अनिवार इच्छा त्याला शांत बसू देत नाही आणि दुसरीकडे तुम्ही पालक अशा सर्व वस्तुंपासून त्याला सदोदित दुर ठेवत असता. इथून पालक बालक यांच्यातला पहिला संघर्ष सुरू होत असतो. पालकांशी लबाडी करण्याचे पहिले प्रयोग तिथून मुल शिकू लागते. तुम्ही त्याला नाहीच म्हणणार आहात हे ठरलेले असेल. तर तुम्हाला अंधारात ठेवून ती गोष्ट करणे त्याला भाग होऊन जाते ना? त्यापेक्षा नव्या गोष्टी त्याला समजावून घेण्यात मदत केली तर? मुलातली उर्जा व कुतुहल त्याच्याच सहकार्याने वापरले. तर मुल सहजगत्या तुमच्याशी समरस होत जाते. त्याला लपवाछपवीची गरज उरत नाही. तुम्ही अधिक काळ मुलाच्या सहवासात रहाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला हाताळणे अवघड अजिबात नाही.

मुल पायावर उभे राहून चालू बोलू लागले, मग ते एक स्वतंत्र माणूस झालेले असते. पण त्याला कुटुंबात पुरेसे स्वातंत्र्य मिळत नाही, की समानतेची वागणूक मिळत नाही. आपोआप त्याच्यातली बंडखोर वृत्ती उफ़ाळून येऊ लागते. शक्य तिथे मुल तुमच्याशी झुंज देऊ बघते किंवा तुमची नजर चुकवून काही उपदव्याप करू बघते. त्याला विश्वासात घेतले, तर हे सहज टाळता येते. इतर प्रत्येकजण मोठा म्हणून त्याला लहानपणाची वागणूक देत असतो. त्याचे लाभ मुलांना हवे असतात. पण जिथे लहान असल्याने भेदभाव होतो, तिथे लहानपण नकोसे होते. तिथून ही बंडखोर वृत्ती डोके वर काढत जाते. अशावेळी त्या बंडखोरवृत्तीला थेट सामोरे जाणे अगत्याचे असते. त्याकडे पाठ फ़िरवून किंवा तिला चेपून काहीही साध्य होत नाही. एक परिणाम मुले कोमेजण्याचा असतो किंवा बंडखोरी प्रबळ होण्याचा धोका संभवतो. म्हणून मुलांच्या अपेक्षा व गरजांना सामोरे जाणे अधिक सुलभ सोपे असते. त्याला समान वागणूक मिळत असल्याचा अनुभव देण्यापासून त्या़ची सुरूवात होऊ शकते. सर्वसाधारणपणे मुल लहान असते आणि उभ्याने त्याच्याशी बोलणे झाले. तर त्याला नजर उंचावून तुमच्याकडे बघावे लागते. उलट तुम्ही खाली नजर करून त्याच्याशी बोलत असता. याऐवजी तुम्ही खाली बसून नजर समोरासमोर करून बोललात, तर तुम्ही एका पातळीवर असता. मुले अशा स्थितीत तुम्हाला समजून घ्यायला राजी असतात. आपली अपेक्षा बाजूला ठेवून त्याची अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याविषयीचा मुलांचा पुर्वग्रह निर्माण व्हायला हातभार लागत नाही. सामंजस्य निर्माण व्हायला मदत होते. आपण लहान आहोत म्हणून आपल्यावर दादागिरी होते, अशी समजुत मुलांना बिघडायला व पालक-बालक दरी वाढवायला मदत करते. म्हणूनच आपल्या अपेक्षा विसरून मुलाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा जाणण्याला महत्व आहे. अलिकडले त्यातले अनुभव मी पुढल्या लेखात मांडणार आहे.

मुले निरागस असतात आणि त्यांच्या अपेक्षाही खुप किरकोळ असतात. त्यांना तुम्ही विश्वासात घेऊ शकलात तर कुठल्याही मोठ्या किंवा अशक्य मागण्या मुले करत नाहीत. बहुतांश वेळी मुलांना पालकांचे लक्ष वेधून घेण्यात रस असतो. म्हणून मुले आपल्या कामात व्यत्यय आणतात. तेव्हा चिडचिडेपणा करण्यापेक्षा त्याच्या अशा अपेक्षांचा आपल्या अपेक्षापुर्तीसाठी सहजगत्या वापर करून घेता येतो. व्यवहारात ती मुले आपले म्हणणे मान्य झाले वा अपेक्षा पुर्ण झाली म्हणून खुश होत असली, तरी प्रत्यक्षात ती तुमचीच अपेक्षा पुर्ण करत असतात. त्यांच्या उर्जेचा व इच्छांचा त्यांच्याच नकळत त्यांच्या अभ्यास व विकासामध्ये झका़स वापर करणे त्यामुळे शक्य होते. अखंड बडबड किंवा प्रश्न विचारणार्‍या माझ्या दिड वर्षाच्या कन्येला गप्प करण्यासाठी मी पाढे पाठ करून गाण्यासारखे गुणगुणत गेलो आणि तिही त्यात रमली. तिच्या नकळत तिला कोवळ्या वयात ३०० पर्यंत पाढे पाठ होऊन गेले होते. त्यातले आकडे वा त्यांचे परस्पर संबंध तिला अजिबात कळत नव्हते. पण गुणगुणताना ते पाढे तिच्या स्मरणात राहुन गेले. असेच कित्येक प्रयोग सहजगत्या होऊ शकतात. पायावर उभे राहू लागलेले मुल स्वतंत्र माणूस असतो आणि त्याला तसे आपण वागवू शकलो, तर त्याच्यात आत्मविश्वास भरणे सोपे होऊन जाते. तो आत्मविश्वास त्या बालकाला पुढल्या आयुष्यातील मोठमोठी शिखरे पार पाडायला उपयुक्त असतो. ते काम फ़क्त पालक करू शकतो. कारण त्या अतिशय कोवळ्या वयात पालक हा मुलासाठी विश्वासाचा सर्वात सुरक्षित कोपरा असतो. एकाचवेळी धाक व विश्वास अशा दोन गोष्टी आपण मुलाच्या मनामध्ये निर्माण करू शकतो. पुढल्या काळात मुलांना हाताळण्यासाठी ती अतिशय निर्णायक अवजारे असतात. हे किती सहजशक्य असते? किती होकरात्मक असू शकते? त्यासाठी काय करायचे?

3 comments:

  1. भाऊ, मला एक वेगळी नजर दिल्याबद्दल आभार तुमचे आभार. दोन लहान बालकांचा पिता म्हणून असलेली माझी जबाबदारी कशा प्रकारे पार पाडावी याची एक दिशा तुम्ही मला दाखवलीत. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. अकसर लोग 12वीं क्लास पास करके महीना 6000 से 15000 रुपये तक ही
    कमाते है और पूरी जिंदगी एसे ही काम करते है पर उन लोगो को ये नही पता
    होता की india से बहार के लोग हमसे कई गुना आगे होते है और वो लोग
    पढाई के साथ साथ इंतना पैसे कमाते है जितनी एक CA का होता है इसकी
    एक ही बजह है की इंडिया के लोग networking में विश्वास नही करते और
    हम लोग सोचते है की बिना कुछ किये ही सब मिल जाये दोस्तों हर काम मे
    मेहनत करना पड़ता है बिना कुछ किये आपको कुछ हासिल नही होगा
    इंडिया का गरीबी का कारण भी ये ही है तो दोस्तों अब में आपको एक
    ऐसा platform के बारे में बातउंगा जिसमे बिना कोई पैसा लगाये आप लोग
    लाखो तक कमा सकते है उसके लिए आपके पास android मोबाइल होना
    बहुत जरुरी है अब आपको अपने android मोबाइल के अंदर एक play store app
    के अंदर जाना है और champ cash लिख के उस app को डाउनलोड करना है
    जब app डाउनलोड हो जायेगा आपको रजिस्टर करना है और sponsor
    code : 321260 लिख कर उस id को पूरा करना है जैसे ही id बनके तैयार हो
    जायेगी तो आपके सामने एक task होगा उसमे कुछ app दिए होंगे उन सभी
    app को एक एक करके डाउनलोड करना है और उन्हें 2 से 3 मिनट तक चलना है
    जैसे ही आप task पूरा कर लोगे तो आपको $1 dollar आपके champ cash
    wallet में मिल जायेगा ज्यादा पैसे कमाने के लिए आपको आपने friends
    को invite करना है जब आपके friends id बनाकर task पूरा कर लेंगे तो आपको
    $0.300-$600 dollar मिलेगा जब आपके फ्रेंड किसी और को invite करेंगे तो
    और उन्होंने टास्क पूरा कर लिया तो भी आपको पैसे मिलेगे और ऐसे 7 लेवल
    तक चलता रहेगा देर मत कीजिए जल्दी से champ cash डाउनलोड करे
    Sponsor code 321260 इस काम को कोई भी कर सकता है students,
    housewife, old man , etc For more information msg me Whats app
    Number 8806656508

    ReplyDelete