Friday, March 1, 2019

इमरान कशाला घाबरला?

rahulrafale के लिए इमेज परिणाम

पुलवामा येथील जिहादी हल्ल्याला आता दोन आठवडे होऊन गेलेत आणि त्यांना चोख उत्तर देण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्यालाही खुप कालावधी उलटून गेला आहे. त्यानंतर भारताने पाकव्याप्त प्रदेशाच्या पलिकडे खुद्द पाक भूमीत जाऊन बालाकोट येथे हवाई हल्ला केल्याला पाचसहा दिवस झाले. तरी पाकिस्तान दर्पोक्तीची भाषा कशाला वापरत नाही? याची अनेक भारतीयांच्या मनात शंका घोळते आहे. प्रामुख्याने ज्यांना सातत्याने अणुयुद्धाच्या भयगंडाने पछाडलेले होते, त्या बुद्धीमान भारतीयांना पाकचे पंतप्रधान इमरान खान यांची नरमाईची भाषा पचलेली नाही. इथे मोदी दर्पोक्ती करीत आहेत आणि इमरान हाती लागलेला भारतीय हवाई दलाचा पायलटही कुठली कटकट केल्याशिवाय तात्काळ भारताच्या हवाली करीत आहेत. त्यामुळे भारतातले पाकप्रेमी शांततावादी भलतेच रडकुंडीला आले आहेत. त्यांना पाक व इमरान यांच्या अशा शेपूट घालण्याचा कमालीचा संताप आलेला आहे. कारण मागल्या सहासात महिन्यात त्यांनी कष्टपुर्वक ज्या राफ़ायल विमान खरेदीचा मुद्दा ऐरणीवर आणून लोकसभेची मस्त तयारी केली होती, त्यावर हे पाकिस्तानी मित्र सहकारी पाणी ओतत चालले आहेत. हुलकावणी देण्यासाठी पाकने काही एफ़१६ विमानेही धाडली व त्यातले एक पाडले गेले. तर इमरानने ५७ इंची छाती फ़ुगवून पुरोगामी भारतीयांची छाती ६० इंच फ़ुगवावी ही अपेक्षा अगदीच मातीमोल होऊन गेली. त्यामुळे वैतागलेल्या एका अस्सल पुरोगामी पत्रकाराने आपल्या ‘सुत्रां’कडून इमरानशी संपर्क साधला आणि त्याची पुरती खरडपाट्टी काढली. तेव्हा दोन देशातील समजूतदारपणाचे रहस्य उलगडू शकले आहे. ते रहस्य राफ़ायल विमानाचे आहे. पाक माघार घेणार नसेल तर राफ़ायल विमानांनी हल्ला करण्याची धमकी मोदींनी दिली, तेव्हा इमरानला घाम फ़ुटला. राफ़ायलच्या एकदम नव्या आधुनिक क्षेपणास्त्राचे नावच इमरानला भयभीत करून गेले.

पाकिस्तानने त्यांच्या हवाई दलाला भारताच्या काश्मिरी प्रदेशात हुलकावणी द्यायला पाठवले होते आणि त्यापैकी एक पाडले गेले. तर त्यांचा पाठलाग करताना भारतीय विमान पाकने पाडले. त्यामुळे आता युद्ध भडकणार याची सर्वांनाच चिंता लागली होती. पण प्रकरण पुढे वाढू नये, अशी सर्वांचीच इच्छा होती. त्यामुळे इमरान यांनीही भारताने शांतता प्रस्थापनेची एक संधी द्यावी अशा गयावया केल्या. हे अनेकांना खटकलेले आहे. तेही स्वाभाविक आहे. जरा कुठे खुट्ट वाजले तरी पाकिस्तान मागल्या दोन दशकात अणुबॉम्बची धमकी देत होता. मग आताच त्यांच्या अणुबॉम्बला काय झाले? ती धमकी कुठे व का गायब झाली? असेही कोडे अनेकांना पडलेले आहे. कारण पाकचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ़ यांनीही पाकने अण्वस्त्रांची भाषा बोलू नये; असा सावधानीचा इशारा दिलेला होता. पण पाकिस्तान इतका गयावया कशाला करतोय? हे कोडे त्यातून उलगडत नाही. अणुबॉम्ब नसेल वापरायचा म्हणून युद्धाला पाकिस्तानने घाबरण्याचे काही कारण नाही. त्यांच्यापाशी तिथेच हजारो प्रशिक्षित फ़िदायीन, घातपाती कायम सज्ज आहेत आणि ते कमी पडतील म्हणून त्यांनी हजारोच्या संख्येने भारतातच बुद्धीजिवी फ़िदायीनही भरती करून ठेवलेले आहेत. एकाच वेळी आपले बुद्धीमंत आणि समोरून पाकिस्तानी फ़िदायीन अधिक पाक सेना यांच्या मार्‍यासमोर भारतीय सेनेचा टिकाव लागू शकणारच नाही. हे कोणीही रणनितीकार ओळखू शकतो. मग पाकिस्तानी नेतृत्वाने व सेनेने असा अवसानघातकीपणा कशाला करावा ना? निदान हवाई हल्ला शक्य नसेल तर आपली उर्मट उद्धट प्रतिहल्ला करण्याची आक्रमक भाषा चालूच ठेवायला हवी ना? पण इमरानने तिचेच मार खाल्ला आणि भारतातले पुरोगामी पुरते बिथरून गेलेले आहेत. त्यांना पाकिस्तानच्या अशा नरमाईने व्यथीत करून टाकले.

पाकिस्तानचा हवाई हल्ला फ़सला तर त्यांच्या ताब्यात सापडलेला भारतीय पायलट कोंडून ठेवण्यापेक्षा त्यांनी भारताच्या हवाली का करावा? तर जिनिव्हा कराराच्या काही तरतुदीमुळे त्याला परत द्यावा लागला असे सांगितले जाते. पण इतर खुलासे मोदी सरकार देते त्यावर विश्वास नसलेल्या पुरोगाम्यांनी जिनिव्हा करारातल्या कलमांवर तरी विश्वास कशाला ठेवावा? म्हणूनच त्यापैकी काहीजणांनी थेट पाकिस्तानातील सुत्रांना गाठून खरा तपशील मिळवण्याचा प्रयत्न केला. बहुधा टकले किंवा तत्सम कारवान, एनडीटीव्ही, हिंदू अशा गुप्तचरांना पुरोगाम्यांनी कामाला जुंपले असावे. तेव्हा धक्कादायक तपशील बाहेर आलेला आहे. पाकचे सेनापती व वरिष्ठ अधिकारी यांनी लढायची सज्जता चालवलेली होती आणि खुद्द ५६ इंची छातीचे नरेंद्र मोदीच भयभीत झालेले होते. भारताला युद्ध परवडणारे नाही म्हणून त्यांनीच युद्ध टाळण्यासाठी आटापिटा सुरू केला होता. त्यांनी पाकिस्तानी राजदूतांकरवी इमरानला निरोप पाठवले. परराष्ट्र खात्यामार्फ़त शांततेचे प्रयास झाले. अगदी काश्मिर परिसरातील चकमकी थांबवून हुर्रीयतच्या नेत्यांनाही अटकेतून सोडायला मोदी तयार झाले होते. पण भारतीय पुरोगाम्यांवर विसंबलेले इमरान कुठलीही माघार घ्यायला वा बोलणी करून विषय संपवायला तयार नव्हते. आता थेट युद्धच आणि त्यात उरलासुरला काश्मिर पादाक्रांत करण्याची भाषाची इमरान बोलत होते. आपल्याला शांती वा बोलणी नकोत, आता युद्धच! इतक्या टोकाला मामला गेलेला होता. तेव्हा शेवटचे हत्यार म्हणून मोदींनी आपण आजपर्यंत जुनीपानी विमाने वापरली युद्ध ब पेटले तर राफ़ायल वापरून हल्ला करावा लागेल, असा इशारा मोदींनी दिला आणि इमरान गडबडला. त्याला गंमत वाटली. अजून फ़्रान्सने भारताला नवी खरेदी झालेली विमाने पुरवलेलीच नाहीत, तर मोदी कुठल्या राफ़ायलने पाकवर हल्ला करणार? या प्रश्नाचे उत्तर ऐकून इमरान आणि पालचे लष्करप्रमुख बाजवाही गर्भगळित होऊन गेले.

इमरान कुठलीही ऑफ़र स्विकारायला राजी नव्हता, तेव्हा मोदी त्याला म्हणाले, आम्हाला मग आमचे सर्वात भेदक अस्त्र उपसावे लागेल. आम्ही राफ़ायलचे सर्वात नवे आणि आधुनिक लढावू विमान पाकिस्तानवर धाडू. त्यात अशी अस्त्रे क्षेपणास्त्रे लावलेली आहेत, की तितकी विध्वंसक शस्त्रे जगाच्या कुठल्याही प्रगत देशाची विमाने वा हवाई दलापाशीही नाहीत. युद्धच हवे असेल तर मग त्यासाठीही सज्ज रहा इमरान! इमरान वचकला आणि म्हणाला, कुठले क्षेपणास्त्र? राफ़ायलचे कुठले नवे मॉडेल? तेव्हा मोदींनी आपल्या नेहमीच्या शैलीत हसून उत्तर दिले, आम्हाला ‘राहुल राफ़ायल’ पाकिस्तानवर सोडावे लागेल. इमरान म्हणाला, हे कुठले राफ़ायलचे मॉडेल? मोदी उत्तरले, ते विमान नाही तर माणूस आहे आणि युद्ध टाळायचे तर त्यासाठी आम्ही राहुल गांधींना पाकिस्तानशी बोलणी करायला पाठवून देऊ. ते ऐकल्यावर जनरल बाजवा यांनी इमरानचा हात दाबला आणि माघार घ्यायला लावले. ते इमरानला म्हणाले, एकवेळ अणुबॉम्ब परवडला, राफ़ायल लढावू विमानाचा ह्ल्ला सुद्धा परवडला. पण आपल्या पाक भूमीत राहुल गांधी नकोय. हे भारताच्या भात्यातले सर्वात भेदक हत्यार आहे. शहाण्यांची बुद्धी निकामी करून टाकते. जाणकारांचे डोके चालेनासे होते. पत्रकार माध्यमांना वेड लागते. सगळी माहिती गडबडून जाते. इमरानही चकीत झाला, आपल्या देशाचा सेनापती भारताच्या या अस्त्राला का घाबरलाय, तेच त्याला कळले नाही. तेव्हा बाजवांनी खुलासा केला, मिस्टर प्रायमिनीस्टर, हे अनगायडेड मिसाईल आहे. ते कुठल्या दिशेने जाईल आणि कोणावर कोसळून त्याचा कधी कपाळमोक्ष करील, त्याचा भरवसा नाही. त्यापेक्षा सरळ भारताशी युद्ध करावे किंवा थेट शरणागती पत्करावी. पण पाकिस्तान टिकवायचा असेल तर आपल्या दिशेने राहुल नावाचे राफ़ायल येऊ नये, यासाठी वाटेल ती किंमत मोजावी.

35 comments:

  1. वाह भाऊ.. समझनेवाले को इशारा काफी है..!

    ReplyDelete
  2. Bhau .. ekdam manavarcha tan halka kelat .. hasun hasun pot dukhu lagle... hats off !!!

    ReplyDelete
  3. एवढ्या गंभीर विषयावर पाचकळ विनोद करू नये.

    ReplyDelete
    Replies
    1. या विषयाचे गांभीर्य तेवढे राहिलेले नाही

      Delete
  4. भाऊ,अप्रतिम लेख.राहुलचे एवढे वस्त्रहरण कुणीच केले नाही.आज आपल्याकडे राफाईल असते तर अभिनंदनला पाकिस्तानी विमानांचा समाचार अधिक परीणामकरीत्या घेता आला असता व एका पेक्षा जास्त F-16 विमानांचा भेद करता आला असता.पायलट अभिनंदन धाडसी आहे व त्याने 35 वर्षे जुन्या मिग विमानाने पाकचे अत्याधुनिक F-16 विमान पाडले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता.राफाएल विरोधक खास करुन राहुल पार तोंडघशी पडले व आता लोकसभा निवडणुकीत वापरण्याचे हत्यार बोथट झाले व मोदी हटाव म्हणणार्यांचे धाबे दणाणले आहे.मला निवडणुकीत विरोधक मोदींना व भाजपला कसे तोंड देणार याची उत्सुकता लागली आहे.

    ReplyDelete
  5. Sarcasm? Is this supposed to be funny?

    ReplyDelete
  6. Hahaha
    Bhau , he. Misile bhaltexh powerful ahe

    ReplyDelete
  7. दर्शन वसंत कोळीMarch 1, 2019 at 7:18 AM

    काय हो भाऊ, कमाल करताय!
    एखादी रंजक रहस्यकथेसारखे खिळवून ठेवलत आणि अचानक रागाRaGaने flopshow केलात. थ्रिलरपटाचा विनोदी वग केलात.... असो...एकदम अप्रतिम शालजोडीतले आणावे तर तुम्हीच. अलिकडेच तुमच्या blog चा शोध लागल्यावर तुमचा fan झालोय व रोजच्या रोज link वर जावून काय वाचनपर्वणी आहे म्हणून check in करत राहतो.
    ही माझी पहिली वहिली प्रतिक्रिया आपल्या blog वर!
    नमस्कार...

    ReplyDelete
  8. भाऊ असल्या गंभीर विषयावर पप्प्याला आणि या पुरोगाम्यांना घेऊन तुम्हाला विनोद सुचताहेत म्हणजे तुमच्या विनोदबुध्दीला मानलं पाहिजे...

    ReplyDelete
  9. फोटो बघून सूरवातीला वाटले की इम्रान पप्पूला घाबरला.

    ReplyDelete
  10. नाका हो असे भारताचे बहुमोल अस्त्र असे मातीमोल करू नका.. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे

    ReplyDelete
  11. ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ha ������

    ReplyDelete
  12. अनगायडेड मिसाईल ... जबरदस्त

    ReplyDelete
  13. अतिशय मार्मिक भाऊ....
    डोळ्यांतून पाणी आलं....
    😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂

    ReplyDelete
  14. प्रथमच शेवट वाचताना हसु आवरता आले नाही. एकदम बरोबर लिहिले आहे.

    ReplyDelete
  15. सारा देश खडा होगा
    पप्पु तेरे सम्मान मे

    सिनेपे बरुद बांधकर
    कुद जा पाकिस्तान मे !

    ReplyDelete
  16. भाऊ जबरदस्त लेख.आचार्य अत्रे,बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखन शैलीची, वाचत असताना सारखी आठवण येत होती.आज या पद्धतीचे लिखाण फार दुर्मिळ झाले आहे.
    धन्यवाद व अभिनंदन.

    ReplyDelete
  17. छान जमलेला विनोदी लेख ! दहापैकी दहा गुण !

    ReplyDelete
  18. उत्कृष्ट व्यंगात्मक टीपण्णी. अभिनंदन भाऊ.

    ReplyDelete
  19. असा मुड लागणे ही पण तुमची कमाल आहे, भाऊ.. 🙏

    ReplyDelete
  20. छान, मस्तच.
    आता राहुल राफेलचे नाव काढणार नाही.

    ReplyDelete
  21. मस्त, मजा आली वाचताना.

    ReplyDelete
  22. छान. अगदी उपरोध, पण कथेच्या रुपात. धन्यवाद

    ReplyDelete