Friday, May 26, 2017

नवा मनु आणि नवी वर्णव्यवस्था

Image result for arundhati yasin malik

बालपणी आजीच्या सहवासात असताना अनेक मजेशीर गोष्टी ऐकयला मिळायच्या. अतिशय चमत्कारीक व तर्काच्या कसोटीला कधीच न उतरणार्‍या, अशा गोष्टी मुळात निर्माण कोणी केल्या, असाही प्रश्न माझ्या चिकित्सक बालबुद्धीला तेव्हाही पडलेला होता. कारण गोष्ट आवडली तरी ती तर्काच्या कसोटीला घासली, मग त्याचा खुलासा होत नसे. आजीला प्रश्न विचारून उपयोग नव्हता. कारण ती म्हणायची गोष्ट अशी आहे, म्हणून आहे. ऐकायची नसेल तर सोडून दे! कोवळ्या वयात तिला आव्हान देण्याची कुवत नव्हती. पण अशा गोष्टी कायमच्या स्मरणात राहून गेल्या. पुढल्याही काळात अशा चमत्कारीक व तर्कबुद्धीला झुगारणार्‍या अनेक कथा कादंबर्‍या वाचल्या. चित्रपटही बघितले. पण आजीच्या गोष्टीतल्या गोष्टी निर्माण कोणी केल्या, तो प्रश्न कायम मनात राहून गेला होता. अलिकडे त्याचे उत्तर हळुहळू मिळते आहे. ठराविक तथाकथित शहाणे व बुद्धीमान लोक अशा गोष्टी सराईतपणे तयार करतात आणि त्याचा मानवी मनावर इतका घट्ट पगडा बसतो, की काही पिढ्या उलटल्यावर त्या गोष्टी आजीच्या गोष्टी होऊन जातात. अशा निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे. कारण जसा त्या गोष्टीचा आजीकडे खुलासा नव्हता, तसाच आजकाल अनेक शहाण्यांकडेही चमत्कारीक गोष्टी वा युक्तीवादाचा तर्कशुद्ध खुलासा नसतो. किंबहूना आजची अनेक बौद्धिक वक्तव्ये युक्तीवादही आजीच्या गोष्टीसारखे होऊन गेले आहेत. अरुंधती रॉयच्या निमीत्ताने जे काही वैचारिक वादळ या आठवड्यात घोंगावले, तेव्हा आजीच्या गोष्टीतला एक प्रसंग आठवला. त्यातली राजकन्या खुप नाजूक होती आणि एकदा हत्तीवरून नगरात फ़िरायला गेली होती. वाटेत हत्तीच्या पायाखाली लिंबू चिरडले आणि त्याचा आंबटपणा अनावर होऊन राजकन्येला संध्याकाळी सर्दी झाली. अरुंधतीच्या बाबतीत तसेच काहीसे झालेले नाही काय?

राजकन्या हत्तीवर अंबारीत बसलेली. म्हणजे हत्तीचाही तिला स्पर्श नव्हता. अशा हत्तीच्या पायाखाली लिंबू चिरडल्याने, त्याची बाधा राजकन्येला कशी होऊ शकते? शिवाय लिंबू चिरडल्याने सर्दी कशी होऊ शकते? तर त्याचे एकच उत्तर आजीपाशी होते. ती राजकन्या तुमच्याआमच्या सारखी ओबडधोबड नव्हती. ती अतिशय नाजूक होती. सहाजिकच कुठल्याही किरकोळ गोष्टीनेही तिला बाधा होणे स्वाभाविक होते. तुमचेआमचे काय? आपल्याला अवघा हिमालय अंगावर उपडा केला, तरी सर्दी होऊ शकत नाही. कुठलेही रोगजंतू वा विषाणू अंगावर सोडले, म्हणून आपल्याला कुठलीही रोगबाधा होऊ शकत नाही. राजकन्येची गोष्टच वेगळी असते. अरुंधती ही आजच्या जमान्यातील अशीच राजकन्या नाही काय? ती नेमकी कोण आहे, त्याचा देशातल्या ९९ टक्के लोकांनाही पत्ता नसेल. पण तिच्याविषयी कोणी परेश रावल नावाच्या अभिनेत्याने काही लिहीले वा अभिजित नावाच्या गायकाने अनुदार उद्गार काढले; म्हटल्यावर अवघ्या देशाला रोगबाधा झाल्यासारखा कल्लोळ माजला आहे. माजणारच! अरुंधती कोणी कोपर्डी गावातली सामान्य घरातली ओबडधोबड मुलगी नाही. किंवा कुठल्या गल्लीत चाळीत जन्मलेली सामान्य घरातली तरूणी नाही. ती बुकर पारितोषिक मिळालेली इंग्रजी लेखिका आहे. तिला पुरोगामी लोकांनी राजकन्या म्हणून मान्यता दिलेली आहे. तिची तुलना गल्लीतल्या वा कोपर्डीतल्या मुलीशी होऊ शकत नाही. त्यांच्यावर कोणी बलात्कार केला वा नंतर त्यांचा मुडदा पाडून खांडोळी केली, म्हणून देशाचा बाल बाका होत नसतो. कोणाला दोन अश्रू वहाण्यासही सवड मिळत नसते. पण अरुंधतीची गोष्टच वेगळी! तिच्याविषयी कोणाच्या मनात बरेवाईट आले किंवा कोणी दोन अपशब्द उच्चारले; तरी देशाची सगळी व्यवस्थाच पुरती ढासळून पडत असते. आजीने किती नेमकी गोष्ट बालपणी सांगितली होती ना?

कुठे दुर काश्मिरमध्ये दगड मारणार्‍या जमावाला रोखण्यासाठी नितीन गोगोई नावाच्या एका सेनाधिकार्‍याने त्याच जमावातील म्होरक्याला पकडून आपल्या जीपवर बांधले आणि हवे तर त्यालाच दगड मारा, असे आवाहन जमावाला करून गप्प केले. त्यावरून खुप गदारोळ माजला होता. अशावेळी त्याच दगडफ़ेक्या जमावाचे कौतुक करीत भारतीय सैनिकांची अखंड निंदानालस्ती करणार्‍या अरुंधतीची आठवण, परेश रावल नावाच्या अभिनेत्याला झाली. त्याला अशी कल्पना सुचली की जीपवर त्या जमावाच्या म्होरक्याला बांधण्यापेक्षा अरुंधतीला बांधले असते तर? ही नुसती कल्पना आहे. अरुंधतीला कोणी तसे जीपवर बांधलेले नाही, की तिच्यावर कोणी दगड मारलेला नाही. पण त्या काश्मिरात नित्यनेमाने शेकड्यांनी भारतीय जवान जमावाकडून दगड अंगावर घेत आहेत. जखमी होत आहेत आणि कधीकधी प्राणालाही मुकत आहेत. कोणाला त्यांच्या जिवाची किंमत आहे काय? कशाला असेल? सैन्यात भरती झाले म्हणजेच त्यांनी मरणाला कवटाळाले आहे आणि मरायलाच पुढाकार घेतला आहे. मग मारलेले दगड त्यांनी खावेत किंवा जीवानिशी मरावे. कोणाला फ़िकीर आहे? असा कोणी सैनिक तिथे मारला गेल्यावर त्याच्या कुटुंबाला कोणीही वाली रहात नाही. त्याची पुर्ण वाताहत होऊन जाते. एक दिवस शहीद म्हणून अश्रू ढाळले जातात आणि त्या लोकांची पुरती दुर्दशा होऊन जाते. पण त्यासाठी कोणी तथाकथित अरुंधतीभक्त उच्चभ्रू चवताळुन उठला आहे, असे आपल्याला बघायला मिळणार नाही. मात्र कोणा परेश रावळाने अरुंधतीला जीपवर बांधा अशी नुसती कल्पना मांडली, तरी आधुनिक राजाच्या दरबारातील तमाम दरबारी सरदार खवळून उठले आहेत. उगाच नाही! शेवटी मामला राजकन्येचा आहे ना? तुमच्याआमच्या मुली महिला भरडल्या गेल्या तर काय मोठे? तसलेच नशीब घेऊन त्या जन्माला आलेल्या नसतात काय?

पाच वर्षापुर्वी महाराष्ट्रातल्या सातारा नावाच्या जिल्ह्यात एका संस्थेमध्ये अनेक गरीब महिलांच्या लैंगिक शोषणाची बातमी झळकली होती. पद्मश्री पुरस्कार मिळालेला एक लेखक समाजसुधारक ही संस्था चालवत होता आणि त्याच्यावरच असा आरोप झालेला होता. तो आरोप पोलिसांनी गुन्हा म्हणून नोंदवून घेतला. तर टाहो फ़ोडून न्याय मागणार्‍या त्या सामान्य घरातील महिलांसाठी कितीजणांना आस्था वाटलेली होती? आज ज्यांना अरुंधतीविषयी इतकी आपुलकी उफ़ाळून आली आहे, त्यापैकी कुणीही केवळ अरुंधतीसाठी आपण अश्रू ढाळतोय, असे म्हटलेले नाही. तर परेश रावलने एका महिलेचा अवमान केला, म्हणून आक्रोश चालविला आहे. खरेच हा आक्रोश महिलेच्या प्रतिष्ठेसाठी आहे, की एका तथाकथित आधुनिक राजकन्येसाठी आहे? कारण महिलेसाठीचा आक्रोश असता, तर त्यातले सगळेच्या सगळे चेहरे तेव्हाही आक्रोश करताना दिसले असते. सातार्‍यातील त्या सामान्य घरातील महिलांच्या बलात्काराच्या, अन्यायाच्या विरोधात न्यायाचा आवाज बुलंद करण्यासाठी ह्यांनी नक्की आक्रोश केला असता. पण त्यातले बहुतांश सर्वच्या सर्व तेव्हा मौनव्रत धारण करून बसलेले होते. त्यापैकी कोणालाही त्या बलात्काराचे बळी झालेल्या मुली महिलांविषयी किंचीत आस्था दाखवण्याची गरज भासली नव्हती. उलट प्रत्येकाला बलात्कारी आरोपी लक्ष्मण माने यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे पुरोगामी चळवळ आणि विचारांचे काय होणार; अशा चिंतेने भयग्रस्त केलेले होते. कारणही सोपे सरळ आहे. बलात्कार करणारा त्यांच्यातला एक होता. त्याने गुन्हा केला तर तो गुन्हा नव्हता, तर गुन्हा करण्याचा त्याला विशेषाधिकार होता. फ़रारी झालेल्या त्या गुन्हेगाराला शोधण्यात पोलिसांना मदत करण्याचीही कोणाला गरज वाटालेली नव्हती. तर अनेकजण खरेच बलात्कार झाला काय, अशीच शंका काढत होते.

आता आपण थोडी तुलनाही करून बघू. लक्ष्मण माने प्रकरणात अनेक महिलांनी आपल्यावर सातत्याने बलात्कार झाला व आपले लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. म्हणजे काहीतरी घडल्याचा विषय होता. तिथे धमकी किंवा नुसतेच शब्द वापरले असेही नव्हते. त्या महिलांना प्रत्यक्षात यातना सोसाव्या लागल्या होत्या. पण त्याची किंचीतही वेदना अरुंधतीसाठी अश्रू ढाळणार्‍यांना झालेली नव्हती. मात्र आज अरुंधती या राजकन्येविषयी नुसते काही शब्द वापरले, तरी प्रत्यक्षात बलात्कारापेक्षाही मोठे भयंकर घडल्याचा आक्रोश सुरू आहे. हत्तीच्या पायाखाली लिंबू चिरडले तर सर्दी होते की नाही? आता थोडे अरुंधतीकडे वळू! कोण ही राजकन्या? अकस्मात दोन दशकांपुर्वी भारतीय उच्चभ्रू वर्गात तिचा समावेश झाला. कुठल्या तरी तिने लिहीलेल्या इंग्रजी पुस्तकाला बुकर पारितोषिक मिळाले आणि अकस्मात भारतीय शहाण्यांना आपल्या संस्थानाला नवी राजकन्या लाभल्याचा साक्षात्कार झाला. तात्काळ तमाम माध्यमातून बारीकसारीक विषयात अरूंधतीला काय वाटते वा इचे कुठल्या विषयात काय मत आहे; त्याला भरमसाठ प्रसिद्धी मिळू लागली. अशारितीने सामान्य भारतीयांसमोर वाजतगाजत नवी राजकन्या आली. तिच्या कर्तबगारी वा गुणवत्तेविषयी ९९ टक्के देशवासी पुरते अंधारात आहेत. किंबहूना देशातील ८० टक्के लोकांना तर अरुंधती रॉय हे नावही ऐकलेले वाटणार नाही. पण त्याच अरुंधतीचा अपमान म्हणजे अवध्या भारतीय महिला वर्गाचा अपमान! महिला लोकसंख्येवरचा हल्ला असल्याचा कल्लोळ चालू आहे. बाकी देशात रोज डझनभर बलात्कार होत असतात. मुली महिलांचे लैंगिक शोषण चालू असल्याने महिलांचे जीवन असुरक्षित वगैरे काहीही झालेले नसते. त्या बिचार्‍या तशाच छळ यातना सोसण्यासाठी जन्माला येतात आणि सोसुन अनावर झाले मग मरून जातात. कौतुक राजकन्येच्या सर्दीचे असते.

अशारितीने उच्चभ्रू वर्तूळात अरुंधतीचा प्रवेश झाल्यावर ती तितक्याच आकस्मिकरित्या सामाजिक न्यायासाठी लढणारी नेता कार्यकर्ताही होऊन गेली. एकेदिवशी दिल्लीत जंतरमंतर येथे नर्मदा बचाव आंदोलनासाठी धरणे धरून बसलेल्या मेधा पाटकरांच्या सोबत अरुंधती येऊन बसली आणि परिवर्तनाच्या चळवळीची अध्वर्यु होऊन गेली. त्या नर्मदा संबंधाने एक याचिका सुप्रिम कोर्टात होती आणि तिथे धरणाच्या बांधकामाला स्थगिती देण्यात आलेली होती. त्या स्थगितीचा निर्णय येताच देशात न्याय कसा जिताजागता असल्याची द्वाही पाटकरांनी फ़िरवली होती. याचिकेची सुनावणी पुढे चालली होती. अखेरीस अंतिम निकाल आला, तेव्हा नर्मदेच्या धरणाला सुप्रिम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आणि तात्काळ अशा पुरोगामी विचारांचा न्यायावरला विश्वास उडाला. त्या निकालाच्या विरोधात पाटकर व अरुंधतीने अपमानास्पद शब्द उच्चारले होते. सहाजिकच न्यायालयाने त्यांना अवमान नोटिसा धाडल्या होत्या. मेधाताई अजून राजकन्या झालेल्या नसाव्यात. म्हणूनच त्यांनी निमूटपणे आपले आक्षेपार्ह शब्द मागे घेतले आणि कोर्टाची माफ़ी मागितली होती. पण अरुंधती पडल्या राजकन्या! त्यांना कुठले कोर्ट जाब विचारू शकते? अरुंधतीने माफ़ी मागण्यास साफ़ नकार दिला आणि पुन्हा सुप्रिम कोर्टाचा अवमान केला. सहाजिकच राजकन्येला न्यायाचा आदर राखण्यासाठी प्रतिकात्मक का होईना, शिक्षा देणे भाग होते. म्हणून तिला फ़क्त एक दिवसाच्या कैदेची शिक्षा फ़र्मावण्यात आली. महिला असल्याने तिला सौम्य शिक्षा देत असल्याची टिप्पणी कोर्टाने केलेली होती. तर आपल्याला महिला म्हणन वेगळे वागवण्याची गरज नाही, अशी भाषा अरुंधतीने तेव्हा केलेली होती. आपल्याला महिला म्हणून वेगळी वागणूक नको असल्याची भूमिका त्याच राजकन्येची असेल, तर आज तिच्या बा्बतीत वापरल्या केलेल्या शब्दांनी महिलांची विटंबना झाल्याचा आक्रोश कशाला?

खुद्द अरुंधतीलाच आपल्याला महिला म्हणून वेगळी वागणूक नको असेल, तर तिच्या दरबारी लोकांचा आक्रोश कशासाठी चालू आहे? आपल्या महिला असण्याशी खुद्द अरुंधतीलाच कर्तव्य नाही. पण दरबारी मंडळींची ही एक खासियत असते. तिथे घडोघडी व सोयीनुसार नियम निकष बदलत असतात. आपल्या सोयीचा असतो तेव्हा तो न्याय असतो आणि आपली गैरसोय झाली, मग तोच अन्यायही ठरवण्याचे युक्तीवाद कायम सज्ज असतात. केजरीवालवरचे आरोप सिद्ध होईपर्यंत तो निर्दोष असतो. पण इतरांचे आरोप मात्र नुसते केल्याक्षणी व्यक्ती दोषी ठरलेली असते. कारण अशी मुठभर मंडळी आधुनिक पुरोगामी साम्राज्यातील दरबारी वा मनसबदार असतात. त्यांनी कोणालाही अपशब्द वापरावे, कोणाचाही अवमान करावा. कुणावरही बलात्कार करावा. त्याला इतरांनी निमूटपणे शरण गेल्यास देश व समाज पुरोगामी असतो. त्यांच्या अशा मनमानीत बाधा आणली, मग देशाची प्रतिष्ठा लयाला जात असते, संविधान धोक्यात येत असते. त्यांनी निवडणूक जिंकली, मग मतदानयंत्रे चोख व विज्ञाननिष्ठ असतात. पण त्यांचा पराभव झाल्यास यंत्रामध्ये गफ़लत झालेली असते. त्यांच्यापैकी कोणी बलात्कार केल्यास ते महिला सशक्तीकरण असते आणि त्यांच्यापैकी कुणाच्या अतिरेकाला आव्हान दिले गेल्यास, तो घटनाबाह्य गुन्हा असतो. निकष सोपा असतो. तुम्ही कुठल्या वर्गात आहात याला महत्व असते. मनुवाद कायम असतो. वर्णव्यवस्था कायम असते. प्रत्येक युगात मनुच्या व्यवस्थेला शिव्याशाप देत नव्या मनुची व्यवस्था कायम केली जात असते. तिथेही तुम्ही पुरोगामी वर्णात असाल, तर सगळे गुन्हे माफ़ असतात आणि तुमची वर्णी प्रतिगामी वर्णात लागली, मग तुम्हाला न्याय मागायचाही अधिकार उरत नाही. मनुने कात टाकली आहे, आधुनिक मनुने आज नवी वर्णव्यवस्था उभी केलेली आहे.

5 comments:

  1. Ticha khara nav Sussain Roy aahe mhantat. He lok Hindu nav vaprun dukan chalawtat.

    ReplyDelete
  2. भाऊ जबरदस्त!!!
    अरुंधती बाबतीत खालील मजकूर सध्या सोशल मिडिया मध्ये फिरतोय..
    परंतु नेहमी अरुंधती मिडियाची का एवढी फेवरीट आहे.. हे यामुळे समजतय....
    मिडिया वर आपण एवढे अवलंबून आहोत की हे खरोखर सत्य आहे का ही पण शंका येते..
    व परत परत मिडिया मध्ये करोडो रुपये गुंतवणारा पिटर मुखर्जी आठवतोय.. परंतु हे सर्व आता सोशल मिडिया मुळे समजतय...
    गेल्या 2 दशकात व राजदिप निखिल केतकर आर्णब गोस्वामी यांनी कधीही अरुंधती ची या बॅग्रांऊडची चर्चा केली नाही...

    Arundhati Roy's mother was a Keralite Christian . Her name was Mary.
    She was working in Metal Box , Calcutta as Secretary and met Mr. Roy, a Bengali Hindu who was also with Metal Box, Calcutta. They married and Arundhati was born to them.

    Mr. Roy's elder brother, Mr. P .L Roy, is the father of Prannoy Roy of NDTV.
    P L Roy too married a christian woman who was wicked enough to make him convert . Or should we say P L Roy was fool enough not to see her hidden agenda.
    That's how Suzzanna Arundhati Roy and Prannoy James Roy were born and are first cousins.

    It is interesting to note how both Prannoy (James) Roy and (Suzzanna) Arundhati Roy have kept their christian names hidden from public and work on a Anti Hindu propaganda and agenda together under their alias Hindu names to deceive Hindus !
    भाऊ हे खर आहे का?

    ReplyDelete
    Replies
    1. हो हे खर आहे. Wikipedia वर तुम्ही वाचा. तीच नाव Suzanna Arundhati Roy असच दिलेल आहे. बाकीचीसुद्धा तुम्ही नमूद केलेली माहिती खरी आहे.

      Delete